शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मालेगावच्या प्रश्नांबाबत मुंबईत शिष्टमंडळाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:37 IST

राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मालेगाव जिल्हानिर्मितीसह विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसाकडे : जिल्हानिर्मितीसह मांजरपाडा पाणीप्रश्नासंदर्भात कॉँग्रेसचे निवेदन

मालेगाव : राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मालेगाव जिल्हानिर्मितीसह विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात संगमनेर येथे राज्याचे महसूलमंत्री काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मालेगाव जिल्हानिर्मितीसाठी भेट घेतली होती. मालेगाव जिल्हानिर्मितीची पहिली मागणी माजीमंत्री डॉ. बळीराम हिरे यांनी १९८० साली केली होती. या मागणीला तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्याबरोबर शरद पवार यांचेसह आजपर्यंत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात मालेगाव जिल्हानिर्मिती होऊ शकली नाही. आजमितीला मालेगाव येथे जिल्हास्तरीय सर्वच शासकीय कार्यालये अस्तित्वात आहेत. नवीन जिल्हानिर्मितीसाठी राज्य सरकारला जास्त भार पडणार नाही, याकडे शिष्टमंडळाने मंत्रिमहोदयांचे लक्ष वेधले. महसूल प्रशासनाच्या दृष्टीने कामकाजासाठी अवाढव्य बनलेल्या नाशिक जिल्ह्याचे विभाजन होणे ही प्रशासकीय आणि आता काळाचीही गरज असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. यावर, मालेगाव जिल्हानिर्मितीसाठी आपण निश्चित पुढाकार घेऊ, असे आश्वासन शरद पवार, पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिले. यावेळी कसमादेच्या प्रलंबित सिंचन प्रकल्प आणि पाणीप्रश्नांकडेही शिष्टमंडळाने त्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला जाता कामा नये, यासाठी शेतकऱ्यांचा गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उगम पावणाºया नार-पार, अंबिका-औरंगा, ताण-माण यासारख्या जवळपास २८ नद्या पश्चिम वाहिन्या आहेत. या नद्यांचे ५० टीएमसी पेक्षा जास्त पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी प्रवाही वळण पध्दतीने पूर्व वाहिनी करून तापी खोºयातील गिरणा नदीत टाकल्यास मालेगावसह कळवण, देवळा, नांदगाव, चांदवडसह जळगाव जिल्हयाचा शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा व उद्योगाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे हे प्रलंबित प्रकल्प त्वरित मार्गी लावावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात प्रसाद हिरे, दशरथ निकम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, केवळ हिरे, बाजीराव निकम, प्रांतिक काँग्रेसचे सचिव चंद्रकांत गवळी, रामराव शेवाळे, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर. डी. निकम , तालुकाध्यक्ष अनिल अहिरे, नितीन हिरे, त्र्यंबक मार्तंड, राजेंद्र शेळके आदींसह परिसरातील पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात सहभाग होता. अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकपदाच्या नियुक्तीसाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) रद्द करावी, टीईटी परीक्षा व पवित्र पोर्टल या दोन्ही योजना तत्काळ बंद कराव्यात, शिक्षक व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वीस टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान द्यावे, शिक्षकांना वीस वर्षांनंतर सरसकट निवडश्रेणी दिली जावी.

टॅग्स :congressकाँग्रेसMalegaonमालेगांव