शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वर्षाअखेर मिळणार देवळालीवासियांना स्मशानभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 14:57 IST

संसरी येथील स्मशानभूमीचा प्रश्न सध्या चर्चेत असून गावकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून होणा-या त्रासाबाबत ग्रामपंचायतीने लिखित स्वरूपात बोर्डाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. संसरी गावची लोकसंख्या आठ हजार पेक्षा अधिक झाली आहे तर देवळाली कॅम्प ची लोकसंख्या सुमारे साठ हजारांच्या पुढे

ठळक मुद्देपी. रमेश : कॅन्टोंमेंट बोर्डाकडून पाठपुराव्याचे आश्वासनप्रत्येक गावाला आपली स्वत:ची स्मशानभूमी असते

नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना संसरी ग्रामस्थांनी स्मशानभुमी वापरण्यास नकार दिल्यामुळे देवळाली स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत खासदार हेमंत गोडसेंसह गावातील शिष्टमंडळाने बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी.रमेश यांची भेट घेऊन संसरी ग्रामस्थांच्या व्यथा मांडली असता, येत्या डिसेंबर अखेर याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.संसरी येथील स्मशानभूमीचा प्रश्न सध्या चर्चेत असून गावकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून होणा-या त्रासाबाबत ग्रामपंचायतीने लिखित स्वरूपात बोर्डाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. संसरी गावची लोकसंख्या आठ हजार पेक्षा अधिक झाली आहे तर देवळाली कॅम्प ची लोकसंख्या सुमारे साठ हजारांच्या पुढे गेली आहे. प्रत्येक गावाला आपली स्वत:ची स्मशानभूमी असते परंतु देवळालीची स्मशानभूमी दारणा किनारी शहरापासून दूर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्त्यात पुलाखालून जाण्यास आडकाठी निर्माण होत असल्याने देवळालीकरांची अंतिम यात्रा कष्टमय पद्धतीने होत आहे. यावर पर्याय म्हणून संसरी गावच्या स्मशानभूमीचा वापर केला जात आहे. संसरीकरांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून देवळालीकरांना अद्याप पर्यंत सहकार्य केले आहे. मात्र सध्या संसरी गावात असलेल्या स्मशानभूमीत दोनच दाहिन्या असल्याने गावातील व्यक्तींचे अंत्यसंस्कार अथवा इतर विधी असल्यास देवळालीकरांना स्मशानभूमी उपलब्ध होऊ शकत नाही. अशावेळी संसरी ग्रामस्थांविषयी देवळालीकरांचा गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे देवळालीकरांची स्वत:ची स्मशानभूमी अद्यावत करून तिथे सुविधा द्याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच युवराज गोडसे,उपसरपंच अनिल गोडसे,मनपा नगरसेवक केशव पोरजे,संजय गोडसे,विनोद गोडसे, शाम गोडसे आदींच्या शिष्टमंडळाने ब्रिगेडिअर पी.रमेश यांची भेट घेवून चर्चा केली. देवळालीकरांसाठी स्वत:ची स्मशानभूमी तयार करण्यासाठी बोर्डाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या डिसेंबर पर्यंत यातून मार्ग निघेल असे आश्वासन पी. रमेश यांनी शिष्टमंडळाला दिले.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक