शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:14 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत.

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत. सप्तशृंगगडावर भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच सप्तशृंगगडावर पाणीटंचाईची समस्या दरवर्षी नित्याचीच झाली आहे. भवानी पाझर तलावाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच सप्तशृंगगडावरील नागरिकांना उपलब्ध नाही. ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळीपाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. यंदा एप्रिलच्या मध्यातच भवानी पाझर तलावाचे काम सुरू असल्याने तलाव कोरडाठाक झाला असून, त्यामुळे गडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम यंदा हाती घेण्यात आले असून, गळती रोखण्यासोबतच तलावातील गाळही काढला जात असल्याने पुढच्या वर्षीपासून सप्तशृंगगडावर पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत अशी अपेक्षा गडावरील नागरिक बाळगून आहेत. मात्र सध्याची भयाण परिस्थिती बघता पुढील दोन महिने पाण्याची स्थिती गंभीर राहणार असून, सप्तशृंगगडावरील पाणीटंचाईच्या दृष्टीने शासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागत आहे.टॅँकरने पाणीपुरवठासप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरने पाणीपुरवठा करून सप्तशृंगगड ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मदतीने देवीभक्तांची तहान भागवत आहे. सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाºया भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थ गंगा, जमुना, पंजाबी कुंडावरून पायपीट करून पाणी आणतात. गावातील तीन हातपंप, गावातील खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चैत्रोत्सव काळात ग्रामस्थ व भाविकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या टँकरने सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करण्यात आला होता व आजही चालू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई