शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:14 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत.

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत. सप्तशृंगगडावर भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच सप्तशृंगगडावर पाणीटंचाईची समस्या दरवर्षी नित्याचीच झाली आहे. भवानी पाझर तलावाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच सप्तशृंगगडावरील नागरिकांना उपलब्ध नाही. ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळीपाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. यंदा एप्रिलच्या मध्यातच भवानी पाझर तलावाचे काम सुरू असल्याने तलाव कोरडाठाक झाला असून, त्यामुळे गडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम यंदा हाती घेण्यात आले असून, गळती रोखण्यासोबतच तलावातील गाळही काढला जात असल्याने पुढच्या वर्षीपासून सप्तशृंगगडावर पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत अशी अपेक्षा गडावरील नागरिक बाळगून आहेत. मात्र सध्याची भयाण परिस्थिती बघता पुढील दोन महिने पाण्याची स्थिती गंभीर राहणार असून, सप्तशृंगगडावरील पाणीटंचाईच्या दृष्टीने शासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागत आहे.टॅँकरने पाणीपुरवठासप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरने पाणीपुरवठा करून सप्तशृंगगड ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मदतीने देवीभक्तांची तहान भागवत आहे. सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाºया भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थ गंगा, जमुना, पंजाबी कुंडावरून पायपीट करून पाणी आणतात. गावातील तीन हातपंप, गावातील खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चैत्रोत्सव काळात ग्रामस्थ व भाविकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या टँकरने सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करण्यात आला होता व आजही चालू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई