शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:14 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत.

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत. सप्तशृंगगडावर भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच सप्तशृंगगडावर पाणीटंचाईची समस्या दरवर्षी नित्याचीच झाली आहे. भवानी पाझर तलावाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच सप्तशृंगगडावरील नागरिकांना उपलब्ध नाही. ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळीपाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. यंदा एप्रिलच्या मध्यातच भवानी पाझर तलावाचे काम सुरू असल्याने तलाव कोरडाठाक झाला असून, त्यामुळे गडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम यंदा हाती घेण्यात आले असून, गळती रोखण्यासोबतच तलावातील गाळही काढला जात असल्याने पुढच्या वर्षीपासून सप्तशृंगगडावर पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत अशी अपेक्षा गडावरील नागरिक बाळगून आहेत. मात्र सध्याची भयाण परिस्थिती बघता पुढील दोन महिने पाण्याची स्थिती गंभीर राहणार असून, सप्तशृंगगडावरील पाणीटंचाईच्या दृष्टीने शासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागत आहे.टॅँकरने पाणीपुरवठासप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरने पाणीपुरवठा करून सप्तशृंगगड ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मदतीने देवीभक्तांची तहान भागवत आहे. सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाºया भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थ गंगा, जमुना, पंजाबी कुंडावरून पायपीट करून पाणी आणतात. गावातील तीन हातपंप, गावातील खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चैत्रोत्सव काळात ग्रामस्थ व भाविकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या टँकरने सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करण्यात आला होता व आजही चालू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई