शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वर्धापन दिनानिमित्त दीक्षा विधी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:27 IST

सुसंस्कृत व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ज्ञानमंदिराची नितांत गरज असून, समतेचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अंगणगाव येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित दीक्षा विधी सोहळा व कीर्तन सप्ताहाच्या सांगता समारोहप्रसंगी प.पू. मोहनराज अमृते यांनी केले.

येवला : सुसंस्कृत व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ज्ञानमंदिराची नितांत गरज असून, समतेचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अंगणगाव येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित दीक्षा विधी सोहळा व कीर्तन सप्ताहाच्या सांगता समारोहप्रसंगी प.पू. मोहनराज अमृते यांनी केले.  गेल्या पाच दिवसांपासून अनेक कीर्तनकारांच्या अमृतवाणीमधून महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधरस्वामींचे तत्त्वज्ञान पोहचविण्याचे काम सुरू होते. संध्याकाळी दररोज श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन, विडावसर करून रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असे. या विज्ञान युगातील पिढी व्यसनाकडे वळलेली दिसते. अंधश्रद्धा वाढलेली दिसते. हिंसेचे प्रमाण वाढलेले दिसते. या सर्वांपासून दूर करण्यासाठी स्वामींचे समतेचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान लोकापर्यंत पोहचविण्यासाठी गरजेचे आहे. यासाठी अशा वर्धापन दिनाची व कीर्तन सप्ताहाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अमृते बाबांनी केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष सुकणेकर बाबा होते. आयोजन श्रीकृष्ण ज्ञानमंदिराचे संचालक दत्तराज चिरडे यांनी केले होते. यानिमित्ताने श्रीकृष्णमूर्तीसह संतमहंतांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच श्रीकृष्ण मूर्तीस मंगल-स्नान, गीतापाठ पारायण झाले. सकाळी नऊ वा. प.पू. मनोहरशास्री सुकेणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. धर्मसभा मंडप उद्घाटन अमरावती येथील प.पू. मोहनराज अमृते यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन मराठे बाबा गंगापूर व बाळासाहेब मेहेरकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक साहेबराव महानुभाव यांनी केले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सन्यास दीक्षा विधी सोहळा गोपीनाथ अमृते यांनी दत्तराज बाबा चिरडे यांना निमित्त करून हदगाव येथील दत्ताबापू विध्वांश यांच्या हस्ते सन्यास विधी सोहळा झाला. कार्यक्रमासाठी वाल्हेराज बाबा, अजनगावकर बाबा, मनीषदादा बीडकर यांच्यासह प्रकाश नन्नावरे, अंबादास बनकर, विठ्ठल आठशेरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक