शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

बोगस कांदा बियाण्यांमुळे उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:29 IST

मानोरी : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांमध्ये फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा जमिनीतच सडून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याने यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट होणार असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीचा देखील फटका बसणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

ठळक मुद्देउन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान

मानोरी : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांमध्ये फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा जमिनीतच सडून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याने यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट होणार असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीचा देखील फटका बसणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.यंदा येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून, ऐन काढणीला आलेला कांद्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांदा उत्पादनात घट होणार आहे.दरवर्षी मुबलक प्रमाणात पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे उत्पादन शेतकरी घेत होते. यंदा मात्र पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने उन्हाळ कांदा उत्पादनात देखील घट होणार असल्याने आर्थिक नियोजन कोलमडणार असल्याचे देखील शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. त्यात उन्हाळ कांद्याला दरही समाधानकारक मिळत नसल्याने उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली असल्याचे दिसून येत आहे.यंदा अवकाळी पावसामुळे रोपांसह बियाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची उशिरा लागवड शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. मात्र, उशिरा केलेल्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याने कांदा लागवडीनंतर काही दिवसांतच कांद्यांना डोंगळे आल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असल्याचे दिसून येत आहे.कांद्यांना डोंगळे आल्याने यंदा कांदा साठवावा की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. डोंगळे आलेले कांदे आधीच पाण्याविना करपून चालले असताना त्यात डोंगळ्यांचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ कांदा साठवून ठेवल्यास कांदा लवकर खराब होण्याची धास्ती शेतकरी वर्गासमोर उभी राहिली आहे.दरम्यान, कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, कांद्यांना केलेल्या मशागतीचा उत्पादन खर्च निघणेदेखील सध्या शेतकऱ्यांना दुरापास्त होत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर सर्वत्र सरासरीच्या तुलनेत एक हजार रुपयांच्या खाली असल्याने कांदा साठवून ठेवावा की अल्प दरात विकावा, अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची बियाण्यांमध्ये फसगत झाल्याने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कांद्यांना दरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवणे देखील अवघड होणार असून, त्यात लॉकडाऊन झाल्यास यंदा उन्हाळ कांद्याला हजारो रुपये खर्च करून पदरी निराशा पडल्याशिवाय राहणार नाही.- सागर वाकचौरे, शेतकरी, शिरसगाव लौकी. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी