शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

दि्वतीय वर्ष अभियांत्रिकीच्या १० टक्के जागांमध्ये घट; अकरावी सायन्सकडे वाढणार विद्यार्थ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 17:37 IST

अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून,  नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु आता जागांमध्ये कपात केल्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासोबतच विज्ञान शाखेच्या अकरावी प्रवेशावरही याचा परिणाम होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचा डिप्लोमाऐवजी विज्ञान शाखेच्या अकरावीला प्रवेश घेण्याकडे कल वाढण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वतर्विली जात आहे. 

ठळक मुद्देअभियांत्रिकी थेट द्वीतीय वर्ष प्रवेशराखीव जागांमध्ये 10 टक्के कपात विद्यार्थ्यांचा अकरावीकडे वाढण्याची शक्यता

नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून,  नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु आता जागांमध्ये कपात केल्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासोबतच विज्ञान शाखेच्या अकरावी प्रवेशावरही याचा परिणाम होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचा डिप्लोमाऐवजी विज्ञान शाखेच्या अकरावीला प्रवेश घेण्याकडे कल वाढण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वतर्विली जात आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात पदविका पूर्ण केल्यानंतर पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) १० टक्के कपात केली आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्यासाठी  बारावीनंतर थेट पदवी प्रवेशाचा पर्याय असून दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविकेनंतर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेता येतो. पदविका अभ्यासक्रमानंतर अभियांत्रिकी प्रवेशसाठी यापूर्वी २० टक्के राखीव जागा होत्या. परंतु, एआयसीटीईने नव्याने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी राखीव जागांचे प्रमाण १० टक्के कमी केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा जवळपास निम्म्याने कमी होणार  आहे. त्यामुळे सध्या पदविके चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीचा प्रवेश घेताना पसंतीचे महाविद्यालय मिळविण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करून नये, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.कोट-एआयसीटीईच्या निर्णयामुळे सध्या तंत्रशिक्षण पदविका घेणाºया विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी मिळविण्यासाठी जवळपास निम्म्या जागा कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून, त्यांना चांगले गुण असूनही अपेक्षित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे अवघड होणार आहे. माझ्या मुलाला ९२ टक्के गुण असूनही आम्हाला त्याच्या प्रवेशाची काळजी लागली आहे. - अशोक हुंडेकरी, पालक  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय