शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दि्वतीय वर्ष अभियांत्रिकीच्या १० टक्के जागांमध्ये घट; अकरावी सायन्सकडे वाढणार विद्यार्थ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 17:37 IST

अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून,  नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु आता जागांमध्ये कपात केल्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासोबतच विज्ञान शाखेच्या अकरावी प्रवेशावरही याचा परिणाम होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचा डिप्लोमाऐवजी विज्ञान शाखेच्या अकरावीला प्रवेश घेण्याकडे कल वाढण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वतर्विली जात आहे. 

ठळक मुद्देअभियांत्रिकी थेट द्वीतीय वर्ष प्रवेशराखीव जागांमध्ये 10 टक्के कपात विद्यार्थ्यांचा अकरावीकडे वाढण्याची शक्यता

नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून,  नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु आता जागांमध्ये कपात केल्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासोबतच विज्ञान शाखेच्या अकरावी प्रवेशावरही याचा परिणाम होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचा डिप्लोमाऐवजी विज्ञान शाखेच्या अकरावीला प्रवेश घेण्याकडे कल वाढण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वतर्विली जात आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात पदविका पूर्ण केल्यानंतर पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) १० टक्के कपात केली आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्यासाठी  बारावीनंतर थेट पदवी प्रवेशाचा पर्याय असून दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविकेनंतर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेता येतो. पदविका अभ्यासक्रमानंतर अभियांत्रिकी प्रवेशसाठी यापूर्वी २० टक्के राखीव जागा होत्या. परंतु, एआयसीटीईने नव्याने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी राखीव जागांचे प्रमाण १० टक्के कमी केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा जवळपास निम्म्याने कमी होणार  आहे. त्यामुळे सध्या पदविके चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीचा प्रवेश घेताना पसंतीचे महाविद्यालय मिळविण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करून नये, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.कोट-एआयसीटीईच्या निर्णयामुळे सध्या तंत्रशिक्षण पदविका घेणाºया विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी मिळविण्यासाठी जवळपास निम्म्या जागा कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून, त्यांना चांगले गुण असूनही अपेक्षित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे अवघड होणार आहे. माझ्या मुलाला ९२ टक्के गुण असूनही आम्हाला त्याच्या प्रवेशाची काळजी लागली आहे. - अशोक हुंडेकरी, पालक  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय