शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

कर्जमाफी, भरपाईसाठी सरकारची भेट घेऊ :  शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:01 IST

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आपण सरकारकडे करू अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

नाशिक : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आपण सरकारकडे करू अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. वणी-कळवण रस्त्यावर शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली. त्यावेळी शेतकºयांशी संवाद साधताना ते बोलत होते.बाळू गांगोडे या शेतकºयाने सोयाबीनचे उद्ध्वस्त झालेले पीक भरल्या डोळ्याने पवार यांना दाखविताच उपस्थितांचे मन हेलावले. बाजरीच्या कणसांना फुटलेले कोंब, काळ्या पडलेल्या सोयाबीनच्या शेंगा, मणी गळून पडलेले द्राक्ष पाहून पवार यांनी उपस्थित शेतकºयांशी संवाद साधत तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांची साक्ष काढली. यावेळी शेतकºयांनी आपल्या साºया व्यथा कथन करताना जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँका शेतकºयांना पीक कर्ज देत नाहीत, उलट बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्याचे सांगून सहकार निबंधकांकरवी बजावलेल्या नोटिसा पवार यांना दाखविल्या. ज्या शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळाला व त्यांची नावे यादीत आली अशा शेतकºयांना बँका नवीन कर्ज देण्यास दारापुढे उभे करीत नसल्याचे सांगितले. तर पंचनामे करण्यासाठी आलेले तलाठी ३० टक्क्यांपेक्षा शेतकºयांच्या पिकांचे कमी नुकसान झाल्याचे पंचनामे करीत असल्याची तक्रार केली.यावेळी पवार यांनी तालुका कृषी अधिकाºयांकडून कळवण तालुक्यातील माहिती घेतली. गेल्या दोन दिवसात पंधरा टक्के पंचनामे झाल्याचे त्यांनी सांगितले, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण झाले की त्याचा अहवालात पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर झालेले नुकसान खूपच आहे, आम्ही सरकारकडे ते मांडू पण तुम्हाला काय अपेक्षित आहे अशी विचारणा पवार यांनी केली. त्यावर शेतकºयांनी पिकांचे झालेले सर्व नुकसान मिळावे, कर्ज माफी व्हावी अशी मागणी केली. त्यावर कोणत्या पिकांना किती भरपाई मिळेल अशी विचारणा पवार यांनी करताच, तहसीलदारांना त्याची माहिती असल्याचे दिसून आले नाही. त्यांनी राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले. जवळपास अर्धातास पवार यांनी शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यावर ते सर्व एकत्रित करून व गावनिहाय, पीकनिहाय किती नुकसान झाले त्याची माहिती गोळा करून जिल्ह्णातील राष्टÑवादीचे सर्व आमदार माझ्या उपस्थितीत राज्य सरकारच्या प्रमुखाला भेटतील व सारी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली जाईल. सरकारने या गंभीर परिस्थतीत शेतकºयांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहून मदतीसाठी निर्णय घ्यावा. ते घेतील अशी अपेक्षा आहे, नाही घेतली तर पुढे काय करायचे त्याबाबतची भूमिका आपण घेऊ, ती भूमिका काय असेल हे सांगायची येथे वेळ नसल्याचेही पवार म्हणाले. यावेळी आमदार नितीन पवार, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, कोंडाजी आव्हाड, रवींद्र पगार, जयश्री पवार आदी उपस्थित होते.सरसकट पंचनामे करण्याची पवार यांची मागणीजिल्ह्यातील शेतकºयांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले असून, या पिकांसाठी शेतकºयांनी कर्ज घेतले, ते पीकही आता वाया गेले आहे. संपूर्ण एक वर्ष वाया गेले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकºयांना त्यासाठी करावी लागली. संकट मोठे असले तरी, त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. त्यासाठी राज्य व केंंद्र सरकारकडे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी शेतकºयांची कर्ज माफी कशी करता येईल याचा सरकारने विचार करावा.२ज्या बॅँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देणे बंद केले अशा बॅँकांनी शेतकºयांना कर्ज देण्याची भूमिका घ्यावी, शेतकºयांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे व त्यांना एकरी पीक नुकसानीची भरपाई द्यावी हाच शेतकºयांना मोठा आधार होऊ शकतो, असे शरद पवार यांनी पिंगळवाडे येथे शेतकºयांशी संवाद साधताना सांगितले.बारा तासांत  साडेतीनशे  किलोमीटर प्रवासजिल्ह्णात परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यापासून झोडपून काढल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी शरद पवार यांनी इगतपुरी ते थेट बागलाण असा सुमारे बारा तासांत साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास केला.च्सकाळी साडेदहा वाजता पवार यांनी घोटी नजीकच्या टाके येथे भेट दिली त्यानंतर रायगडनगर व नाशिक येथे त्यांचे आगमन झाले. दुपारी दीड वाजेनंतर पवार यांनी थेट दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी येथे भेट देऊन शेतकºयांशी संवाद साधला.च्कळवण तालुक्यातील पांडाणेनजीक शेतात भेट दिली. तेथून कळवण मार्गे खामखेडा, डांगसौंदाणे रस्त्याने थेट सटाणा गाठले. वीरगावमार्गे पवार यांनी सायंकाळी सात वाजता पिंगळवाडे, मुंगसे या गावांना भेटी देऊन पाहणी केली. रात्री दहा वाजता त्यांचे नाशकात आगमन झाले.द्राक्ष उत्पादकांना रडू कोसळले; मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारापवार यांनी आपल्या दौºयात बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे गावाला भेट दिली. हंगामपूर्व द्राक्ष घेणाºया या गावात सुमारे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकºयांनी हंगामपूर्व द्राक्ष घेतले आहेत; परंतु परतीच्या पावसामुळे शेतकºयांचे ७० ते ९० टक्के पीक वाया गेले. पवार यांनी भर पावसात केदा दावल भामरे यांच्या शेतात भेट दिली. त्यानंतर तेथे जमलेल्या शेकडो शेतकºयांशी संवाद साधला. केदा भामरे यांनी २० एकरवर द्राक्षबाग घेतली असून, त्यांचे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आपली भावना व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले व ते काहीच बोलू शकले नाही तर किशोर खैरनार या तरुण शेतकºयाने रडतच आपल्या भावना व्यक्त केल्या. सुमारे आठ एकरवर द्राक्ष बाग घेतली असून, बॅँकेचे ५० लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्याचे सांगितले.बॅँकेचे अधिकारी दररोज घरी येतात, आईच्या गळ्यातील डोरलेदेखील गहाण ठेवण्यात आले असून, सरकारने द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा खैरनार यांनी दिला. अशाच प्रकारच्या भावना दिलीप बनकर, दीपिका चव्हाण, रामचंद्र बापू पाटील, अशोक गायकवाड यांनीही व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारagricultureशेती