शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज माफीपेक्षा कर्जवसुलीच जास्त

By admin | Updated: June 28, 2017 00:39 IST

नायगाव : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी घोषित केले असले तरी ही कर्जमाफी कमी, कर्ज वसुलीच जास्त असल्याची चर्चा नायगाव खोऱ्यात रंगत आहे.

  दत्ता दिघोळे । लोकमत न्यूज नेटवर्क

नायगाव : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी घोषित केले असले तरी ही कर्जमाफी कमी, कर्ज वसुलीच जास्त असल्याची चर्चा नायगाव खोऱ्यात रंगत आहे. कर्जमाफीसाठी दिलेले नियम व अटींमुळे प्रत्यक्षात किती जणांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल हे सांगणे अवघड झाले आहे. शासनाने जाहीर केलेली शाब्दीक कर्जमाफी ‘सरसकट फसवी’ ठरत असल्याची चर्चा आहे. जाहीर केलेली कर्जमाफी कमी तर दिड लाख रुपयांची माफी घेण्यासाठी शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम भरण्याची अट आल्यामुळे यात बँकेची वसुलीच जास्त होणार असल्याने ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या सरसकट या शब्दांच्या खेळाची शेतकऱ्यांना सध्या चांगलीच उपरती होतांना दिसत आहे. ऐन खरीपाच्या हंगामात या माफीच्या गोंधळात बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. नायगाव खोऱ्यात यातील आठ ते दहा गावातील हजारो शेतकऱ््यांना कृषी कर्ज वाटणाऱ्या गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या १ हजार ९११ थकबाकी शेतकऱ्यांपैकी अंदाजे केवळ ९०७ शेतकरी दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. सुमारे एक हजार चार शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपयांच्या शासनाच्या कर्ज माफीसाठी पात्र ठरण्यासाठी प्रथम सुमारे २५ कोटी रुपयांचे कर्ज भरावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या या शब्दांच्या खेळाणे उर्वरीत कर्ज भरण्याचा नियम म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकरी वर्गात या कर्जमाफीचा सर्वच थरातुन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. शासनाच्या या फसव्या कर्जमाफी पासून नायगाव खो-यातील हजारो शेतकरी वंचित राहणार असल्यान सरकारने कर्जमाफीचा फेर विचार करुन सरसकट माफी करुन शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी बसवून बळीराजाला आधार देण्याची गरज असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. शेतकरी संपाच्या सुरवातीस या संपाच्या जनजाग्रुतीसाठी सोशिल मिडीयातुन जेवढा आवाज उठला तेवढाच आवाज सध्याच्या शासनाच्या फसव्या कर्जमाफी बाबत सध्या चांगलीच तीव्र प्रतीक्रि या उमटत आहे. तत्वता, अंशता, सरसकट, नियम व अटी आदी शाब्दीक खेळाची विविध मजेदार मेसेजची देवाण-घेवाण सुरु असून तरु ण शेतकरी तीव्र शब्दात शासनाच्या कर्जमाफीचा निषेध करत आहे. सुकाणु समितीच्या निर्णयाचे स्वागत करत पुन्हा होणाऱ्या संपाबाबत चर्चाही सोशिल मिडीयावर सुरू झाल्याचे दिसत आहे.