शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कडवा कालव्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:00 IST

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे शाळा सुटल्यानंतर घरी जावून पोहण्यासाठी गेलेले दोन विद्यार्थी कडवा कालव्यात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील एका विद्यार्थ्यास वाचविण्यात यश आले; मात्र १३ वर्षीय सहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देविंचूरदळवी : एकाला वाचविण्यात यश

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे शाळा सुटल्यानंतर घरी जावून पोहण्यासाठी गेलेले दोन विद्यार्थी कडवा कालव्यात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील एका विद्यार्थ्यास वाचविण्यात यश आले; मात्र १३ वर्षीय सहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विंचूरदळवी येथे पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर साईराज मनोहर तांबे (१३) व ओमकार राजू पांडे (१०) हे घरी गेले. दप्तर ठेवल्यानंतर दोघे जामगाव रस्त्याजवळ वाहणाºया कडवा कालव्याकडे सायकल घेऊन गेले. दोघेही पोहण्यासाठी कालव्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात बुडू लागले. रस्त्याने दुचाकीहून जाणाºया संपत डांगे यांच्या सदर प्रकार लक्षात आला.याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, विनोद टिळे करीत आहेत. डांगे यांनी आरडाओरड करीत नागरिकांना मदतीसाठी बोलावले. तोपर्यंत डांगे यांनी ओमकार पांडे यास बाहेर काढले. मात्र साईराज मनोहर तांबे (१३) याचा यात दुर्देैवी मृत्यू झाला. नागरिकांच्या मदतीने मृत साईराज याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साईराज हा सहावी इयत्तेत होता. सिन्नर नगर परिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.