शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरमधमेश्वरमधील मृतसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:27 IST

लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे्र पाणीटंचाई : १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन कुचकामी

लासलगाव : लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणीजिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.कडक उन्हाळा सुरू असल्याने बोअरवेल्स आटल्याने तसेच लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा संपुष्टात आल्याने लाभार्थी गावांना सात ते आठ दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता.लासलगाव विंचूर या दोन प्रमुख गावांसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना नांदूरमधमेश्वर बंधार्यावरून करण्यात आलेली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई लाभार्थी गावांना जाणवू लागली आहे नांदूर मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा आता संपुष्टात आलेला असल्याने पाणीपुरवठा समितीच्या वतीने बंधाºयातील मोटारी पुढे हलविण्यात आल्या असून पाणीसाठा संपुष्टात आल्याने सात ते आठ दिवस आड लाभार्थी गावांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत आहे.योजनेच्या वारंवार फुटणाºया पाईपलाईनमुळे परिसराला विनाकारण सलग काही दिवस नळांना पाणी देता येत नाही. आता तर नांदुरमध्मेश्वर धरणात पाणीच नाही. परंतु ज्यावेळी मुबलक पाणी असते तरीही नाहक टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. . या विनाकारण टंचाईच्या अवकळा कमी होण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक याच्याकडे सदर योजनांची पाईपलाईन गळती दुरु स्तीसाठी लासलगाव ग्रामपंचायतीने दुरु स्ती प्रस्ताव सादर केलेला आहे परंतु सुस्त प्रशासन प्रस्तावास मान्यता देऊन निधी उपलब्ध करु न देत नसल्याचा आरोप पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी केला आहे.लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना ही सन २०१० पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून समतिीस हस्तांतरित करण्यात आली. सादर योजनांची पाईपलाईन १५ ते २० वर्षा पूर्वी टाकण्यात आलेली होती ती अतिशय जीर्ण व खराब झालेली असून सदर पाईप लाईन हि कायम फुटत असते. लासलगाव पाणी पुरवठा समितीस सदरच्या पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी फारमोठ्या प्रमाणावर खर्च येतो लोखंडी पाईपलाईन असल्याने जे. सी. बी. द्वारे खोदाई करून वेल्डीग मशीनने गळती काढावी लागते. गळती काढण्याकरिता पूर्ण पाईपलाईन हि रिकामी करावी लागते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यव होतो गळती काढले नंतर पुनश्च पाईप लाईन भरण्यासाठी पाच ते सहा तास लागतात त्यामुळे विनाकारण वीज जळते त्यामुळे विनाकारण वीज बिलातही वाढ होते एवढा भुर्दंड सोळा गाव पाणी पुरवठा योजना समिती सहन करते गळती मुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करणे अशक्य होते महिला वर्गामध्ये ग्रामपंचायत प्रशासना बद्दल असंतोष निर्माण होतो यामध्ये ग्रामपंचायतीचा काही एक दोष नसतांना विज पुरवठा खंडीत होत असल्याने व पाईप लाईन वारंवार फुटत असल्याने गेली दिवस विस्कळीत होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई