शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नांदुरमधमेश्वरमधील मृतसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:27 IST

लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे्र पाणीटंचाई : १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन कुचकामी

लासलगाव : लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणीजिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.कडक उन्हाळा सुरू असल्याने बोअरवेल्स आटल्याने तसेच लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा संपुष्टात आल्याने लाभार्थी गावांना सात ते आठ दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता.लासलगाव विंचूर या दोन प्रमुख गावांसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना नांदूरमधमेश्वर बंधार्यावरून करण्यात आलेली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई लाभार्थी गावांना जाणवू लागली आहे नांदूर मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा आता संपुष्टात आलेला असल्याने पाणीपुरवठा समितीच्या वतीने बंधाºयातील मोटारी पुढे हलविण्यात आल्या असून पाणीसाठा संपुष्टात आल्याने सात ते आठ दिवस आड लाभार्थी गावांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत आहे.योजनेच्या वारंवार फुटणाºया पाईपलाईनमुळे परिसराला विनाकारण सलग काही दिवस नळांना पाणी देता येत नाही. आता तर नांदुरमध्मेश्वर धरणात पाणीच नाही. परंतु ज्यावेळी मुबलक पाणी असते तरीही नाहक टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. . या विनाकारण टंचाईच्या अवकळा कमी होण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक याच्याकडे सदर योजनांची पाईपलाईन गळती दुरु स्तीसाठी लासलगाव ग्रामपंचायतीने दुरु स्ती प्रस्ताव सादर केलेला आहे परंतु सुस्त प्रशासन प्रस्तावास मान्यता देऊन निधी उपलब्ध करु न देत नसल्याचा आरोप पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी केला आहे.लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना ही सन २०१० पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून समतिीस हस्तांतरित करण्यात आली. सादर योजनांची पाईपलाईन १५ ते २० वर्षा पूर्वी टाकण्यात आलेली होती ती अतिशय जीर्ण व खराब झालेली असून सदर पाईप लाईन हि कायम फुटत असते. लासलगाव पाणी पुरवठा समितीस सदरच्या पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी फारमोठ्या प्रमाणावर खर्च येतो लोखंडी पाईपलाईन असल्याने जे. सी. बी. द्वारे खोदाई करून वेल्डीग मशीनने गळती काढावी लागते. गळती काढण्याकरिता पूर्ण पाईपलाईन हि रिकामी करावी लागते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यव होतो गळती काढले नंतर पुनश्च पाईप लाईन भरण्यासाठी पाच ते सहा तास लागतात त्यामुळे विनाकारण वीज जळते त्यामुळे विनाकारण वीज बिलातही वाढ होते एवढा भुर्दंड सोळा गाव पाणी पुरवठा योजना समिती सहन करते गळती मुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करणे अशक्य होते महिला वर्गामध्ये ग्रामपंचायत प्रशासना बद्दल असंतोष निर्माण होतो यामध्ये ग्रामपंचायतीचा काही एक दोष नसतांना विज पुरवठा खंडीत होत असल्याने व पाईप लाईन वारंवार फुटत असल्याने गेली दिवस विस्कळीत होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई