शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

नांदुरमधमेश्वरमधील मृतसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:27 IST

लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे्र पाणीटंचाई : १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन कुचकामी

लासलगाव : लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणीजिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.कडक उन्हाळा सुरू असल्याने बोअरवेल्स आटल्याने तसेच लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा संपुष्टात आल्याने लाभार्थी गावांना सात ते आठ दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता.लासलगाव विंचूर या दोन प्रमुख गावांसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना नांदूरमधमेश्वर बंधार्यावरून करण्यात आलेली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई लाभार्थी गावांना जाणवू लागली आहे नांदूर मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा आता संपुष्टात आलेला असल्याने पाणीपुरवठा समितीच्या वतीने बंधाºयातील मोटारी पुढे हलविण्यात आल्या असून पाणीसाठा संपुष्टात आल्याने सात ते आठ दिवस आड लाभार्थी गावांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत आहे.योजनेच्या वारंवार फुटणाºया पाईपलाईनमुळे परिसराला विनाकारण सलग काही दिवस नळांना पाणी देता येत नाही. आता तर नांदुरमध्मेश्वर धरणात पाणीच नाही. परंतु ज्यावेळी मुबलक पाणी असते तरीही नाहक टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. . या विनाकारण टंचाईच्या अवकळा कमी होण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक याच्याकडे सदर योजनांची पाईपलाईन गळती दुरु स्तीसाठी लासलगाव ग्रामपंचायतीने दुरु स्ती प्रस्ताव सादर केलेला आहे परंतु सुस्त प्रशासन प्रस्तावास मान्यता देऊन निधी उपलब्ध करु न देत नसल्याचा आरोप पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी केला आहे.लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना ही सन २०१० पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून समतिीस हस्तांतरित करण्यात आली. सादर योजनांची पाईपलाईन १५ ते २० वर्षा पूर्वी टाकण्यात आलेली होती ती अतिशय जीर्ण व खराब झालेली असून सदर पाईप लाईन हि कायम फुटत असते. लासलगाव पाणी पुरवठा समितीस सदरच्या पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी फारमोठ्या प्रमाणावर खर्च येतो लोखंडी पाईपलाईन असल्याने जे. सी. बी. द्वारे खोदाई करून वेल्डीग मशीनने गळती काढावी लागते. गळती काढण्याकरिता पूर्ण पाईपलाईन हि रिकामी करावी लागते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यव होतो गळती काढले नंतर पुनश्च पाईप लाईन भरण्यासाठी पाच ते सहा तास लागतात त्यामुळे विनाकारण वीज जळते त्यामुळे विनाकारण वीज बिलातही वाढ होते एवढा भुर्दंड सोळा गाव पाणी पुरवठा योजना समिती सहन करते गळती मुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करणे अशक्य होते महिला वर्गामध्ये ग्रामपंचायत प्रशासना बद्दल असंतोष निर्माण होतो यामध्ये ग्रामपंचायतीचा काही एक दोष नसतांना विज पुरवठा खंडीत होत असल्याने व पाईप लाईन वारंवार फुटत असल्याने गेली दिवस विस्कळीत होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई