शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात तडफडणा-या आजीबाईला मायेची सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:32 IST

लासलगाव : सेंगऋषी वृद्धाश्रमात केले दाखल

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून रखरखीत उन्हामुळे आजीबाईची स्थिती पाहून अनेकांच्या मनात कालवाकालव झाली.

शेखर देसाई, लासलगाव - तापमानाचा वाढता पारा घराबाहेर पडणे मुश्किल करून सोडत असताना रखरखत्या उन्हात लासलगाव जवळील रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या आजीबार्इंना लासलगावचे संजय बिरार आणि नवनाथ सेंगऋषी आश्रमाचे संस्थापक नवनाथ जराड यांच्या माध्यमातून मायेचा आधार मिळाला आणि मानसिक संतुलन ढळलेल्या या आजीबार्इंना दोहोंनी बळजबरीने सेंगऋषी आश्रमात दाखल करून घेत त्यांचा वनवास संपवला.नाव गाव माहीत नाही. रखरखते ऊन तरीही रस्ता सोडणार नाही अशी जणू भीष्मप्रतिज्ञा केलेल्या आजीबाई गेल्या दीड वर्षांपासून लासलगाव जवळ रस्त्यावर ठाण मांडुन बसलेल्या येणा-या-जाणाऱ्यांना प्रत्येकालाच दिसायच्या. उन-वारा-पाऊस याचा सामना करणा-या या आजीबार्इंना वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतु, आजीबाई काही रस्ता सोडायला तयार नसायच्या. कुणी घेऊन जायला आले की आरडाओरड करणे, काठी मारणे, शिव्या देणे यामुळे आजीबाईचा अनेकांना नाद सोडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रखरखीत उन्हामुळे आजीबाईची स्थिती पाहून अनेकांच्या मनात कालवाकालव झाली. संजय बिरार आणि नवनाथ जराड यांना अनेकांनी फोन करुन आजीबार्इंची अवस्था कळवली आणि त्यांना आश्रमाची किती गरज आहे, याचीही माहिती दिली. आजीबाई एकदम रस्त्यावरच आल्या म्हटल्यावर रात्री-बेरात्री अंधारात अपघाताचाही प्रकार घडू शकतो. त्यामुळे संजय बिरार आणि नवनाथ जराड यांनी मनाचा ठिय्या केला आणि कोणत्याही परिस्थितीत आजीबाईला आश्रमात घेऊन जायचेच असा निर्धार केला. नेहमीप्रमाणे आजीबार्इंनी आरडाओरड केला परंतु, नंतर दम भरल्यावर त्या गाडीत बसायला तयार झाल्या. आजीबार्इंना चालता येत नसल्याने त्यांना उचलूनच गाडीत बसविण्यात आले आणि गाडी आजीबार्इंना घेऊन आश्रमाकडे रवाना झाली. रखरखीत उन्हात तडफडणा-या आजीबार्इंना आश्रमात मायेची सावली लाभली. आजीबाईला आश्रमात आणले तर खरे परंतु, आता त्या आश्रमात किती दिवस राहतात याची चिंता बिरार-जराड यांना लागून आहे. मात्र, त्यांनी त्यांची काळजी वाहायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक