शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

दारणाचे पाणी थांबवले; ३५ टक्के तुटीची भीती

By श्याम बागुल | Updated: November 5, 2018 18:49 IST

नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते

ठळक मुद्देजायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.१ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले,

नाशिक : जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला दारणा धरणाचा विसर्ग सोमवारी सायंकाळी थांबविण्यात आला. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी ८.९ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या निर्णयाने सदरचे पाणी सोडण्यात आले असले तरी, वाहनातील तूट लक्षात घेता जायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध दोन्ही जिल्ह्यांमध्ये आंदोलने होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. परंतु अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडणे भाग पडले. गुरुवार १ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले, परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास महामंडळाने स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातून सोडावयाचे ३.१४ टीएमसी पाणी दारणा धरणातूनच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भावली व मुकणे धरणांतून दारणा धरणात पाणी सोडण्यात आले. मराठवाड्यासाठी पाणी सोडत असताना या पाण्याची चोरी टाळण्यासाठी गोदावरीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तसेच कोल्हापूर बंधाऱ्यांचे निडल्स काढून जागोजागी पोलीस बंदोबस्तात पहारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गेल्या पाच दिवसांत ३.१४ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर सोमवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, पाण्याच्या वहनातील तूट व जागोजागी कोल्हापूर बंधाºयात फळ्या टाकून पाणी अडविण्याच्या प्रकारामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतून ८.९ टीएमसी पाणी सोडण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात जायकवाडीत त्यापैकी जेमतेम ६५ टक्केच पाणी पोहोचू शकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३५ टक्के पाण्याची वहनात गळती व काही ठिकाणी पाण्याची चोरी झाल्याचा संशय आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक