शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दारणाचे पाणी थांबवले; ३५ टक्के तुटीची भीती

By श्याम बागुल | Updated: November 5, 2018 18:49 IST

नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते

ठळक मुद्देजायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.१ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले,

नाशिक : जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला दारणा धरणाचा विसर्ग सोमवारी सायंकाळी थांबविण्यात आला. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी ८.९ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या निर्णयाने सदरचे पाणी सोडण्यात आले असले तरी, वाहनातील तूट लक्षात घेता जायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध दोन्ही जिल्ह्यांमध्ये आंदोलने होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. परंतु अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडणे भाग पडले. गुरुवार १ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले, परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास महामंडळाने स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातून सोडावयाचे ३.१४ टीएमसी पाणी दारणा धरणातूनच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भावली व मुकणे धरणांतून दारणा धरणात पाणी सोडण्यात आले. मराठवाड्यासाठी पाणी सोडत असताना या पाण्याची चोरी टाळण्यासाठी गोदावरीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तसेच कोल्हापूर बंधाऱ्यांचे निडल्स काढून जागोजागी पोलीस बंदोबस्तात पहारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गेल्या पाच दिवसांत ३.१४ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर सोमवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, पाण्याच्या वहनातील तूट व जागोजागी कोल्हापूर बंधाºयात फळ्या टाकून पाणी अडविण्याच्या प्रकारामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतून ८.९ टीएमसी पाणी सोडण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात जायकवाडीत त्यापैकी जेमतेम ६५ टक्केच पाणी पोहोचू शकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३५ टक्के पाण्याची वहनात गळती व काही ठिकाणी पाण्याची चोरी झाल्याचा संशय आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक