शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:49 IST

देवगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, बळीराजाच्या मागचे ग्रहण सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : उत्पादनावर परिणाम शक्य

अवकाळी पावसाने कंबर मोडलेला बळीराजा हिवाळ्यात काहीतरी साध्य होते का, यासाठी कष्ट करत असताना आता त्याही पिकांवर ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहर गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या ढगाळ हवामानामुळे पार कोलमडून गेला आहे. आत्ताच कुठे आंब्याला मोहर फुलायला सुरुवात झाली होती. आंब्याचा मोहर बाहेर पडतो न पडतो तोच ढगाळ हवामानामुळे मोहर गळून पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून हवामान बदलाने कहर केला असून, काही ठिकाणी ढगाळ तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या मोहराच्या अंकुरांना जोरदार फटका बसल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहर फुलण्यास सुरुवात होते. मोहराला पोषक अशी थंडीचे वातावरण लाभल्यास मोहर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परिणामी या महिन्यात आंबा चांगला फुलतो; परंतु ऐनवेळी फुलण्याच्या वेळेला हवामानात झालेल्या बदलामुळे मोहराचे नुकसान झाल्याने आंबा उत्पादन संकटात सापडले आहे. या वातावरणामुळे आंब्याला आलेला मोहर पावसामुळे गळायला सुरुवात झाली असून, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. यामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळालेल्या अवस्थेत दिसत आहे, तर काही ठिकाणी काळपट पडला आहे. हापूस, केशरी, राजापुरी आदी प्रकारच्या आंब्यांच्या झाडांचा मोहर ढगाळ वातावरणामुळे गळून पडल्याने आंब्याच्या गोडव्याला घरघर लागली आहे. वातावरणीय बदलांमुळे गळून पडत असलेला आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMangoआंबा