शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:49 IST

देवगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, बळीराजाच्या मागचे ग्रहण सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : उत्पादनावर परिणाम शक्य

अवकाळी पावसाने कंबर मोडलेला बळीराजा हिवाळ्यात काहीतरी साध्य होते का, यासाठी कष्ट करत असताना आता त्याही पिकांवर ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहर गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या ढगाळ हवामानामुळे पार कोलमडून गेला आहे. आत्ताच कुठे आंब्याला मोहर फुलायला सुरुवात झाली होती. आंब्याचा मोहर बाहेर पडतो न पडतो तोच ढगाळ हवामानामुळे मोहर गळून पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून हवामान बदलाने कहर केला असून, काही ठिकाणी ढगाळ तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या मोहराच्या अंकुरांना जोरदार फटका बसल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहर फुलण्यास सुरुवात होते. मोहराला पोषक अशी थंडीचे वातावरण लाभल्यास मोहर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परिणामी या महिन्यात आंबा चांगला फुलतो; परंतु ऐनवेळी फुलण्याच्या वेळेला हवामानात झालेल्या बदलामुळे मोहराचे नुकसान झाल्याने आंबा उत्पादन संकटात सापडले आहे. या वातावरणामुळे आंब्याला आलेला मोहर पावसामुळे गळायला सुरुवात झाली असून, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. यामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळालेल्या अवस्थेत दिसत आहे, तर काही ठिकाणी काळपट पडला आहे. हापूस, केशरी, राजापुरी आदी प्रकारच्या आंब्यांच्या झाडांचा मोहर ढगाळ वातावरणामुळे गळून पडल्याने आंब्याच्या गोडव्याला घरघर लागली आहे. वातावरणीय बदलांमुळे गळून पडत असलेला आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMangoआंबा