शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:35 IST

सिन्नर- सायखेडा रस्त्यावर असलेल्या नायगाव घाटात विविध प्रकारचा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न घाट परिसर सध्या कचरा डेपो बनला असून घाटाचे सौंदर्य धोक्यात आले आहे.

तालुक्याच्या उत्तर भागातील सिन्नर - सायखेडा रस्त्यावरील निसर्ग संपन्न असलेल्या नायगाव घाटाचे सौंदर्य गेल्या काही दिवसांपासून धोक्यात आले आहे. येथे माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने वाया जाणारे साहित्य या घाटाच्या परिसरात टाकत आहे. तसेच इतर ठिकाणाहून अनेकजण येथे सर्रासपणे कचरा टाकत असल्याचा प्रकार नजरेस पडत आहे. सुमारे दिड किलोमीटर अंतराचा घाट परिसर गवत तसेच विविध रानफुलांनी नटलेला आहे. डोंगराच्या कुशीतुन नागमोडी वळणे घेत प्रवाशांना विशेषत: लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या निसर्ग संपन्न घाटाचा सध्या कचरा डेपो बनत चालल्यामुळे नायगाव खो-यासह इतर ठिकाणच्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशासह राज्यात एकीकडे स्वच्छतेचे वारे वाहत असतांना निसर्गाने नटलेल्या घाटाचे कच-या बरोबर दुर्गंधीमुळे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपासून प्लास्टिक, चुना, कागदाचे तुकडे, स्टीकर आदीसह विविध प्रकारचा कचरा तसेच दुर्गंधीयुक्त केमिकल या घाटातील रस्त्याच्या कडेला सर्रास टाकला जात आहे.

टॅग्स :Natureनिसर्गforestजंगल