शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

नायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:35 IST

सिन्नर- सायखेडा रस्त्यावर असलेल्या नायगाव घाटात विविध प्रकारचा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न घाट परिसर सध्या कचरा डेपो बनला असून घाटाचे सौंदर्य धोक्यात आले आहे.

तालुक्याच्या उत्तर भागातील सिन्नर - सायखेडा रस्त्यावरील निसर्ग संपन्न असलेल्या नायगाव घाटाचे सौंदर्य गेल्या काही दिवसांपासून धोक्यात आले आहे. येथे माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने वाया जाणारे साहित्य या घाटाच्या परिसरात टाकत आहे. तसेच इतर ठिकाणाहून अनेकजण येथे सर्रासपणे कचरा टाकत असल्याचा प्रकार नजरेस पडत आहे. सुमारे दिड किलोमीटर अंतराचा घाट परिसर गवत तसेच विविध रानफुलांनी नटलेला आहे. डोंगराच्या कुशीतुन नागमोडी वळणे घेत प्रवाशांना विशेषत: लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या निसर्ग संपन्न घाटाचा सध्या कचरा डेपो बनत चालल्यामुळे नायगाव खो-यासह इतर ठिकाणच्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशासह राज्यात एकीकडे स्वच्छतेचे वारे वाहत असतांना निसर्गाने नटलेल्या घाटाचे कच-या बरोबर दुर्गंधीमुळे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपासून प्लास्टिक, चुना, कागदाचे तुकडे, स्टीकर आदीसह विविध प्रकारचा कचरा तसेच दुर्गंधीयुक्त केमिकल या घाटातील रस्त्याच्या कडेला सर्रास टाकला जात आहे.

टॅग्स :Natureनिसर्गforestजंगल