शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

दांडीबहाद्दर ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:52 AM

दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सटाणा : दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  प्रत्येक गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उबलब्ध होण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजातदेखील पारदर्शकता यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार बागलाण तालुक्यातील बहुतांश गावचे आॅनलाइन कामकाज सुरू करण्यात आले आहे. तसेच हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी शौचालयाची कामेदेखील प्रगतिपथावर आहेत. असे असताना इजमाने येथील बापू धुडकू अहिरे आणि विनायक पोपट सूर्यवंशी या दांडीबहाद्दर ग्रामसेवकांमुळे गावकºयांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच दप्तर दिरंगाईमुळे त्या गावातील शौचालयाची कामे न झाल्यामुळे हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाला आहे. आॅनलाइन दप्तर न केल्यामुळे कामकाजात पारदर्शकता दिसून येत नसल्यामुळे दोघा ग्रामसेवकांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत निलंबनाचे आदेश दिले आहेत तर ग्रामविस्तार अधिकारी नितीन देशमुख यांच्यावरदेखील निलंबनाची टांगती तलवार आहे. त्यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी बंद करून ठेवणे. ठेंगोडा येथील अतिक्रमण केल्याप्रकरणी चौकशीत कसूर केला म्हणून त्यांनादेखील कारणेदाखवा नोटीस बजावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.बागलाण तालुक्यात दांडीबहाद्दर ग्रामसेवक जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत. अशा निष्क्रिय ग्रामसेवकांमुळे गावाच्या विकासावर मोठा परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार दोन ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आले असून, ग्रामविस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आगामी काळात शिक्षकांच्या बाबतीतदेखील हेच सूत्र राहणार असल्याचे बागलाणचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी सांगितले.