शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:54 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भागात अद्यापपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नांदूरशिंगोटेत दोन महिन्यात सरासरी 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देदिलासादायक : दोन महिन्यांत 550 मिलीमीटर पावसाची नोंद

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भागात अद्यापपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नांदूरशिंगोटेत दोन महिन्यात सरासरी 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.नांदूरशिंगोटे परिसरात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी सुरुवातीलाच जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात काही अपवाद वगळता नियमितपणे पावसाने हजेरी लावली आहे. नांदूरशिंगोटे, चास, मानोरी, कणकोरी, दोडी, दापूर, माळवाडी आदी भागातील छोटे मोठे बंधारे तुडुंब भरुन वाहत आहे. दरवर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पूरपाण्याने नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे, केटीवेअर, पाझरतलाव भरण्यात येतात. मात्र यावर्षी जुलै महिन्यातच पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदी दुथडी भरुन वाहत असल्याने पावसाचे पाणी पांगरी शिवारातील परिसरात पोहचले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.दमदार पावसामुळे सर्व नद्या, नाल्या, ओढे दुथडी भरुन वाहत होते. डोंगर पायथ्याशी असलेले छोटे- मोठे बंधारे भरून वाहत असल्याने नद्यांना पुर आला आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे येथे जुन महिन्यात 256 तर जुलै महिन्यात 303 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे दोन महिन्यात साडेपाचशे मिलीमीटर पावसाची नोंद येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमान मापकावर झाली आहे. गेल्यावर्षी चारशे मिलीमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी प्रमाण जास्त आहे. पावसाने सर्वच ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षात न वाहिलेले अनेक ओढे व नाले देखील खळखळून वाहत असल्याने बळीराजा सुखावला आहे. 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण