शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:54 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भागात अद्यापपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नांदूरशिंगोटेत दोन महिन्यात सरासरी 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देदिलासादायक : दोन महिन्यांत 550 मिलीमीटर पावसाची नोंद

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भागात अद्यापपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नांदूरशिंगोटेत दोन महिन्यात सरासरी 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.नांदूरशिंगोटे परिसरात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी सुरुवातीलाच जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात काही अपवाद वगळता नियमितपणे पावसाने हजेरी लावली आहे. नांदूरशिंगोटे, चास, मानोरी, कणकोरी, दोडी, दापूर, माळवाडी आदी भागातील छोटे मोठे बंधारे तुडुंब भरुन वाहत आहे. दरवर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पूरपाण्याने नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे, केटीवेअर, पाझरतलाव भरण्यात येतात. मात्र यावर्षी जुलै महिन्यातच पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदी दुथडी भरुन वाहत असल्याने पावसाचे पाणी पांगरी शिवारातील परिसरात पोहचले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.दमदार पावसामुळे सर्व नद्या, नाल्या, ओढे दुथडी भरुन वाहत होते. डोंगर पायथ्याशी असलेले छोटे- मोठे बंधारे भरून वाहत असल्याने नद्यांना पुर आला आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे येथे जुन महिन्यात 256 तर जुलै महिन्यात 303 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे दोन महिन्यात साडेपाचशे मिलीमीटर पावसाची नोंद येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमान मापकावर झाली आहे. गेल्यावर्षी चारशे मिलीमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी प्रमाण जास्त आहे. पावसाने सर्वच ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षात न वाहिलेले अनेक ओढे व नाले देखील खळखळून वाहत असल्याने बळीराजा सुखावला आहे. 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण