शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

गंगापूर समूहातील धरणसाठा ९७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:29 IST

धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नाशिक : धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने दहा दिवस जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे २४ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे नद्यांना मोठा पूर आला होता. गंगापूर, दारणा, कडवा आणि नांदूरमधमेश्वरमधून तर विक्रमी पाण्याचा विसर्ग करावा लागला. सातत्याने विसर्ग सुरू असल्यामुळे पूरपरिस्थितीही मोठ्या प्रमाणात वाढली. याचा फटका गोदाकाठी असलेल्या गावांना चांगलाच बसला.आॅगस्टच्या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून, धरणक्षेत्र वगळता अन्य तालुक्यांमध्ये कुठेही पाऊस नाही. श्रावणसरीची बरसात काही ठिकाणी होत असली तरी धरण क्षेत्रातील पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांच्या पातळीत वाढ झालेली आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दोन दिवसांत वाढ झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी ९३ टक्के असलेला धरणाचा साठा आता ९५.८ टक्के इतका झाला आहे. कश्यपी धरणातदेखील ९९ टक्के साठा असून, गौतमी गोदावरीत ९७ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे. समूहातील एकूण पाणीसाठा आता ९७ टक्क्यांवर पोहोचला असून, मागीलवर्षीच्या तुलनेत एका टक्क्याने पाणीसाठा अधिक आहे. सध्या गौतमी आणि आळंदीमधूनच किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांतील पाणीसाठा चांगलाच वाढला असताना दुसरीकडे दारणा धरणही ९६ टक्के इतके भरले आहे.जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवरयंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणे भरभरून वाहिले असताना मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे उच्चांक मोडीत काढत यंदा पावसाने नाशिककरांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात २४ प्रकल्प असून, सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा १४ टक्क्यांनी अधिक आहे. धरणातील पाणीसाठ्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा पाणीसाठा ७६ टक्के इतका होता. यंदा तो ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणRainपाऊसWaterपाणी