शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर समूहातील धरणसाठा ९७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:29 IST

धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नाशिक : धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने दहा दिवस जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे २४ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे नद्यांना मोठा पूर आला होता. गंगापूर, दारणा, कडवा आणि नांदूरमधमेश्वरमधून तर विक्रमी पाण्याचा विसर्ग करावा लागला. सातत्याने विसर्ग सुरू असल्यामुळे पूरपरिस्थितीही मोठ्या प्रमाणात वाढली. याचा फटका गोदाकाठी असलेल्या गावांना चांगलाच बसला.आॅगस्टच्या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून, धरणक्षेत्र वगळता अन्य तालुक्यांमध्ये कुठेही पाऊस नाही. श्रावणसरीची बरसात काही ठिकाणी होत असली तरी धरण क्षेत्रातील पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांच्या पातळीत वाढ झालेली आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दोन दिवसांत वाढ झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी ९३ टक्के असलेला धरणाचा साठा आता ९५.८ टक्के इतका झाला आहे. कश्यपी धरणातदेखील ९९ टक्के साठा असून, गौतमी गोदावरीत ९७ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे. समूहातील एकूण पाणीसाठा आता ९७ टक्क्यांवर पोहोचला असून, मागीलवर्षीच्या तुलनेत एका टक्क्याने पाणीसाठा अधिक आहे. सध्या गौतमी आणि आळंदीमधूनच किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांतील पाणीसाठा चांगलाच वाढला असताना दुसरीकडे दारणा धरणही ९६ टक्के इतके भरले आहे.जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवरयंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणे भरभरून वाहिले असताना मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे उच्चांक मोडीत काढत यंदा पावसाने नाशिककरांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात २४ प्रकल्प असून, सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा १४ टक्क्यांनी अधिक आहे. धरणातील पाणीसाठ्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा पाणीसाठा ७६ टक्के इतका होता. यंदा तो ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणRainपाऊसWaterपाणी