शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगा, नार-पारचे पाणी वळवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:47 IST

दमणगंगा पिंजाळ तसेच नार-पार खोऱ्यातील १५७ टीएमसी पाणी गुजरातला देण्याऐवजी गोदावरी व गिरणा खोºयात गोदावरी व गिरणा खोºयात वळविण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन भोसले यांनी केली असून, याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक : दमणगंगा पिंजाळ तसेच नार-पार खोऱ्यातील १५७ टीएमसी पाणी गुजरातला देण्याऐवजी गोदावरी व गिरणा खोºयात गोदावरी व गिरणा खोºयात वळविण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन भोसले यांनी केली असून, याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.यासंबंधीच्या निवेदना म्हटले की, नोव्हेंबर महिन्यातच उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा हा प्रचंड दुष्काळाच्या छायेत आलेला आहे. त्यामुळे मागील महिन्यात नाशिक व नगर जिल्ह्यांतून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी समन्यायी तत्त्वावर धोरणानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोडण्यात आले होते. दरवर्षी मराठावाड्यामध्ये पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यांतील पाणी द्यावे लागते. साहजिकच नाशिक-नगरविरुद्ध मराठवाडा असा संघर्ष उभा राहतो. त्यानंतर मात्र आपल्या राज्याला केवळ २० टीएमसी पाणी मिळेल आणि गुजरातला १३७ टीएमसी पाणी देऊ, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली होती. त्याविरुद्ध मी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु गेली चार वर्षे मला माझे म्हणणे मोडण्याची मुभा कमिटीने दिलीनाही.जमिनी आणि त्यावर पडणारे पाणी यावर महाराष्ट्राचा अधिकार असताना गुजरात जास्त पाणी आणि महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, त्यातच राज्य सरकार आणि केंद्र सरकार याबाबत वेगवेगळी भूमिका घेत असल्याने नेमके काय? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण केंद्र आणि राज्याच्या भूमिकाला कडाडून विरोध करावा तसेच या विरोधात लढा उभारावा त्यासाठी आपण योगदान देण्यास तयार आहोत, असेही भोसले यांनी या निवेदनात नमूद केले आहे.चितळे समितीचा अहवालउत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी इ.स. १९९५ मध्ये डॉ. माधवराव चितळे समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्रातील दमणगंगा पिंजाळ व नार-पार या नद्याचे समुद्रात जाणारे १५७ टीएमसी पाणी अडवून गोदावरी व गिरणा या खोºयात वळविल्यास पाणीप्रश्न कायमचा निकाली निघू शकतो, असे अहवालात नमूद केले होते.

टॅग्स :WaterपाणीAshok Chavanअशोक चव्हाण