शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

वादळी पावसाने नुकसानीचा आकडा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:32 IST

नाशिक : वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला असून जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नसली तरी ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले. नुकसानीचा हा प्राथमिक अहवला असून यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्राथमिक अहवालात ५६ जनावरे दगावली १९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नाशिक : वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला असून जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नसली तरी ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले. नुकसानीचा हा प्राथमिक अहवला असून यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.जोरदार वादळीवाºयासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यात नुकसान मालमत्ता आणि पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. जोरदार वाºयाच्या वेगाने शेतपीक भुईसपाट झाले तर पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने त्या ठिकाणी नुकसानीचे प्रमाणही अधिक आहे. सिन्नर तालुक्यात १३८ हेक्टरवरील शेतपीक वाया गेले, तर नाशिक, दिंडोरी, इगतपुरीतील अनेक भागांतील पिकांना पावसाचा फटका बसला. येवला तालुक्यातदेखील मोठ्या पावसाने दाणादाण उडविली. या ठिकाणी १४ घरांची पडझड झाली तर तीन जनावरे दगावली. सिन्नर तालुक्यातही ३० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले.बागलाण तालुक्यात सर्वाधिक ३६ जनावरे दगावली, तर कळवणला ५, नांदगाव २, दिंडोरी, चांदवड, निफाड, मालेगाव, सिन्नरला प्रत्येकी १, येवला येथे ३, नाशिक तालुक्यात ५ याप्रमाणे जनावरे दगावली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, पॉली हाउस, शेडनेट, पोल्ट्री, गोठे तसेच कांदाचाळीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात अशा सुमारे २१ घटना घडल्या असून, यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, वादळवारा आणि जोरदार पावासाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. तहसीलदारांनाही सतर्कतेच्या सूचना देत आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्जता बाळगण्यचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी