शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:13 IST

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.

ठळक मुद्देकांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.एप्रिल महिन्यात काढणी केलेला उन्हाळ कांदा शेतकरी चांगले बाजारभाव मिळावे या आशेने चाळीत साठवणूक करत असतो. या आशेनेच खेडलेझुंगे येथील अशोक दामोधर सदाफळ यांनी आपल्या शेतातील कांदा साठवणुकीसाठी घराशेजारील चाळीत आणून टाकला होता. त्यांच्या या कांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी केली आहे.डाळिंब आणि द्राक्ष शेतीला कंटाळून यांनी या वर्षी कांद्याचे क्षेत्र वाढविले होते. त्यात त्यांना भरघोस उत्पादन झाले होते. हा सर्व कांदा ट्रॅक्टरने भरून साठवणुकीसाठी घराशेजारील कांदा चाळीत समोर वाहून आणून टाकला होता.कोरोना प्रादुर्भावामुळे कांदा साठवणुकीसाठी मजुरांच्या अभावी हा कांदा ७-८ दिवसांपासून चाळीशेजारी पडून होता. नेमकी हीच संधी साधत कुणी विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी यावर युरियायुक्त पाणी टाकून कांदा खराब करण्याचा प्रयत्न केला.यामध्ये २० ते २५ क्विंटल कांदा सडल्यामुळे विक्रीस योग्य राहिला नाही. या दुष्कृत्यामुळे सदाफळ यांचे प्रथमदर्शनी ३० हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.सुर्वातीला सध्याच्या उष्ण व अवकाळी पावसाच्या सरीमुळे कांदा सडला असावा, हा अंदाज बांधण्यात आला; परंतु साठवणूक करताना एकाच जागी खूप मोठ्या प्रमाणात कांदा सडल्यामुळे कोणाचा तरी खोडसाळपणा असावा, असा संशय निर्माण झाला. तंटामुक्ती अध्यक्ष शिवनाथ सदाफळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाहणी केल्यावर रासायनिक खताचा थर आढळून आला. कुणी तरी नुकसान करण्याच्या हेतूनेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले.उन्हाळ कांदा हा डिसेंबरपर्यंत चाळीत साठवलेला असतो. परिसरात आताशी कांदा चाळी भरण्यास सुरुवात झालेली असतानाच असा प्रकार घडल्याने शेतकरी वर्गात भीती पसरली आहे. दोषींना शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी