शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:13 IST

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.

ठळक मुद्देकांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.एप्रिल महिन्यात काढणी केलेला उन्हाळ कांदा शेतकरी चांगले बाजारभाव मिळावे या आशेने चाळीत साठवणूक करत असतो. या आशेनेच खेडलेझुंगे येथील अशोक दामोधर सदाफळ यांनी आपल्या शेतातील कांदा साठवणुकीसाठी घराशेजारील चाळीत आणून टाकला होता. त्यांच्या या कांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी केली आहे.डाळिंब आणि द्राक्ष शेतीला कंटाळून यांनी या वर्षी कांद्याचे क्षेत्र वाढविले होते. त्यात त्यांना भरघोस उत्पादन झाले होते. हा सर्व कांदा ट्रॅक्टरने भरून साठवणुकीसाठी घराशेजारील कांदा चाळीत समोर वाहून आणून टाकला होता.कोरोना प्रादुर्भावामुळे कांदा साठवणुकीसाठी मजुरांच्या अभावी हा कांदा ७-८ दिवसांपासून चाळीशेजारी पडून होता. नेमकी हीच संधी साधत कुणी विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी यावर युरियायुक्त पाणी टाकून कांदा खराब करण्याचा प्रयत्न केला.यामध्ये २० ते २५ क्विंटल कांदा सडल्यामुळे विक्रीस योग्य राहिला नाही. या दुष्कृत्यामुळे सदाफळ यांचे प्रथमदर्शनी ३० हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.सुर्वातीला सध्याच्या उष्ण व अवकाळी पावसाच्या सरीमुळे कांदा सडला असावा, हा अंदाज बांधण्यात आला; परंतु साठवणूक करताना एकाच जागी खूप मोठ्या प्रमाणात कांदा सडल्यामुळे कोणाचा तरी खोडसाळपणा असावा, असा संशय निर्माण झाला. तंटामुक्ती अध्यक्ष शिवनाथ सदाफळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाहणी केल्यावर रासायनिक खताचा थर आढळून आला. कुणी तरी नुकसान करण्याच्या हेतूनेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले.उन्हाळ कांदा हा डिसेंबरपर्यंत चाळीत साठवलेला असतो. परिसरात आताशी कांदा चाळी भरण्यास सुरुवात झालेली असतानाच असा प्रकार घडल्याने शेतकरी वर्गात भीती पसरली आहे. दोषींना शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी