शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:13 IST

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.

ठळक मुद्देकांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.एप्रिल महिन्यात काढणी केलेला उन्हाळ कांदा शेतकरी चांगले बाजारभाव मिळावे या आशेने चाळीत साठवणूक करत असतो. या आशेनेच खेडलेझुंगे येथील अशोक दामोधर सदाफळ यांनी आपल्या शेतातील कांदा साठवणुकीसाठी घराशेजारील चाळीत आणून टाकला होता. त्यांच्या या कांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी केली आहे.डाळिंब आणि द्राक्ष शेतीला कंटाळून यांनी या वर्षी कांद्याचे क्षेत्र वाढविले होते. त्यात त्यांना भरघोस उत्पादन झाले होते. हा सर्व कांदा ट्रॅक्टरने भरून साठवणुकीसाठी घराशेजारील कांदा चाळीत समोर वाहून आणून टाकला होता.कोरोना प्रादुर्भावामुळे कांदा साठवणुकीसाठी मजुरांच्या अभावी हा कांदा ७-८ दिवसांपासून चाळीशेजारी पडून होता. नेमकी हीच संधी साधत कुणी विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी यावर युरियायुक्त पाणी टाकून कांदा खराब करण्याचा प्रयत्न केला.यामध्ये २० ते २५ क्विंटल कांदा सडल्यामुळे विक्रीस योग्य राहिला नाही. या दुष्कृत्यामुळे सदाफळ यांचे प्रथमदर्शनी ३० हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.सुर्वातीला सध्याच्या उष्ण व अवकाळी पावसाच्या सरीमुळे कांदा सडला असावा, हा अंदाज बांधण्यात आला; परंतु साठवणूक करताना एकाच जागी खूप मोठ्या प्रमाणात कांदा सडल्यामुळे कोणाचा तरी खोडसाळपणा असावा, असा संशय निर्माण झाला. तंटामुक्ती अध्यक्ष शिवनाथ सदाफळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाहणी केल्यावर रासायनिक खताचा थर आढळून आला. कुणी तरी नुकसान करण्याच्या हेतूनेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले.उन्हाळ कांदा हा डिसेंबरपर्यंत चाळीत साठवलेला असतो. परिसरात आताशी कांदा चाळी भरण्यास सुरुवात झालेली असतानाच असा प्रकार घडल्याने शेतकरी वर्गात भीती पसरली आहे. दोषींना शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी