शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत शेतमाल, वीटभट्टीसह घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:17 IST

इगतपुरी : तालुक्यातील काही भागात बुधवारी विजेच्या कडकडाटात प्रचंड वादळ वाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

इगतपुरी : तालुक्यातील काही भागात बुधवारी विजेच्या कडकडाटात प्रचंड वादळ वाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जनावरांचा चारासुद्धा भिजला असून, उघड्यावरील संसार असणारे संकटात सापडले आहेत. या भागातील वीटभट्ट्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. हंसराज वडघुले, इगतपुरीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे. सायंकाळी वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. पूर्व भागातील बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, पिंपळगाव मोर, भरविर, अडसरे, टाकेद, खेड आदी गावांना गारपिटीने फटका बसला. यामुळे टमाटे, कांदा, काकडी, दोडके, कोबी, मका, वालवड, गहू आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी पिकांसह जनावरांचा चाराही भिजला. उघड्यावर असलेल्या संसाराचे मोठे नुकसान झाले. या भागातील वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून आधार द्यावा, अशी मागणी पांडुरंग वारुंगसे, हंसराज वडघुले यांनी केली आहे.

------------

पाऊस, वादळ वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात अक्षरश: गारांचा ढीग झाला होता. पीक जगेल तरी कसे?

रब्बी पिकासाठी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके फवारणी करून कसेबसे पीक जगवले हाेते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बँक, पतपेढी, खासगी सावकार यांच्याकडून काढलेले कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांचा झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

- पांडुरंग वारुंगसे,

माजी उपसभापती, इगतपुरी.

------------------

गेल्या काही वर्षांपासून ऋतू आणि हवामानामध्ये प्रचंड अनियमितता झाली असून, अवकाळी पाऊस, गारपीट अशा प्रकारच्या अस्मानी संकटांना शेतकऱ्याला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. यामुळे होणारे नुकसान आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना गर्तेत घालत आहे. आजपर्यंत आम्ही शेकडो मोर्चा, आंदोलने आणि संघर्षातून यावर आवाज उठवला आहे. पंचनाम्याचे फार्स न होता नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळायला हवी.

-हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना.