शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

इगतपुरीत शेतमाल, वीटभट्टीसह घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:17 IST

इगतपुरी : तालुक्यातील काही भागात बुधवारी विजेच्या कडकडाटात प्रचंड वादळ वाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

इगतपुरी : तालुक्यातील काही भागात बुधवारी विजेच्या कडकडाटात प्रचंड वादळ वाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जनावरांचा चारासुद्धा भिजला असून, उघड्यावरील संसार असणारे संकटात सापडले आहेत. या भागातील वीटभट्ट्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. हंसराज वडघुले, इगतपुरीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे. सायंकाळी वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. पूर्व भागातील बेलगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, पिंपळगाव मोर, भरविर, अडसरे, टाकेद, खेड आदी गावांना गारपिटीने फटका बसला. यामुळे टमाटे, कांदा, काकडी, दोडके, कोबी, मका, वालवड, गहू आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी पिकांसह जनावरांचा चाराही भिजला. उघड्यावर असलेल्या संसाराचे मोठे नुकसान झाले. या भागातील वीटभट्ट्यांचे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून आधार द्यावा, अशी मागणी पांडुरंग वारुंगसे, हंसराज वडघुले यांनी केली आहे.

------------

पाऊस, वादळ वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात अक्षरश: गारांचा ढीग झाला होता. पीक जगेल तरी कसे?

रब्बी पिकासाठी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके फवारणी करून कसेबसे पीक जगवले हाेते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बँक, पतपेढी, खासगी सावकार यांच्याकडून काढलेले कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांचा झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

- पांडुरंग वारुंगसे,

माजी उपसभापती, इगतपुरी.

------------------

गेल्या काही वर्षांपासून ऋतू आणि हवामानामध्ये प्रचंड अनियमितता झाली असून, अवकाळी पाऊस, गारपीट अशा प्रकारच्या अस्मानी संकटांना शेतकऱ्याला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. यामुळे होणारे नुकसान आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना गर्तेत घालत आहे. आजपर्यंत आम्ही शेकडो मोर्चा, आंदोलने आणि संघर्षातून यावर आवाज उठवला आहे. पंचनाम्याचे फार्स न होता नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळायला हवी.

-हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना.