शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड कालव्याच्या पाण्याच्या अतिदाबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:06 IST

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्याने निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे कालव्याचे पाणी झिरपून शेजारील शेतात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्र ार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. पालखेड धरण समूह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पालखेड धरण भरले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी सर्वत्र कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. कालव्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने कालवे ओसंडून वाहत आहेत.

ठळक मुद्देअतिवृष्टी । धरण समूहात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा; शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्याने निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे कालव्याचे पाणी झिरपून शेजारील शेतात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्र ार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. पालखेड धरण समूह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पालखेड धरण भरले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी सर्वत्र कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. कालव्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने कालवे ओसंडून वाहत आहेत.बºयाच ठिकाणी कालव्याला अतिप्रमाणात पाणी झाल्याने कालव्यालगत असलेल्या शेतकºयांचे नुकसान होत आहे. कालव्यातून लगतच्या शेतात पाणी पाझरून पिके सडण्याची शक्यता आहे. त्यातच विंचूरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी कालव्यालगत असलेल्या शेतपिकांना धोका निर्माण झाल्याने पाटबंधारे विभागाने पालखेड धरण ओव्हरफ्लो झाल्याने कालव्याचे पाणी बंद न करता पाणी कमी प्रमाणात सोडावे. परिणामी पाण्याचा दाब कमी झाल्याने शेतकºयांचे नुकसान होणार नाही.अतिपावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावलापांडाणे : पावसाने तोंडाशी आलेले डाळिंबाचे पीक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील कोशिंबा सजेतील विजय राव आदींनी दहीवा शिवारातील गट नं. २३३ व २३६ या सुमारे २५ एकरात भगवा नावाच्या डाळिंबाची लागवड केली होती. उन्हाळ्यात टॅँकरने पाणी टाकून डाळिंंबाची झाडे वाचविली, नंतर त्यांनी डाळिंबांची छाटणी केली. तद्नंतर झाडांना योग्य खत व पाण्याचे नियोजन करून चांगल्या प्रकारचा निर्यातक्षम डाळिंब बाग तयार केली. तद्नंतर जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने तोंडाशी आलेले डाळिंबाचे पीक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात दिंडोरी तालुक्यात कोशिंबे परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यात संपूर्ण डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे. २५ एकरमध्ये दोन दिवस सह्याद्री कंपनीला निर्यातक्षम डाळिंब पाठविले व नंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण डाळिंब पीक १६० ते १७० टन माल संपूर्ण पावसाने सडले असून, ८० ते ९० लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामा करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.२५ एकर डाळिंबांची शेती उन्हाळ्यात टॅँकरने विकत पाणी आणून बाग वाचविली. त्यात डाळिंबाचे पीक निर्यातक्षम तयार करून जुलै व आॅगस्ट महिन्यात झालेल्या पिकामुळे माझे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे गांभीर्याने पाहावे.- सुभाष पवार,डाळिंब बागायतदार