शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पालखेड कालव्याच्या पाण्याच्या अतिदाबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:06 IST

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्याने निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे कालव्याचे पाणी झिरपून शेजारील शेतात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्र ार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. पालखेड धरण समूह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पालखेड धरण भरले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी सर्वत्र कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. कालव्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने कालवे ओसंडून वाहत आहेत.

ठळक मुद्देअतिवृष्टी । धरण समूहात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा; शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्याने निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे कालव्याचे पाणी झिरपून शेजारील शेतात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्र ार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. पालखेड धरण समूह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पालखेड धरण भरले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी सर्वत्र कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. कालव्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने कालवे ओसंडून वाहत आहेत.बºयाच ठिकाणी कालव्याला अतिप्रमाणात पाणी झाल्याने कालव्यालगत असलेल्या शेतकºयांचे नुकसान होत आहे. कालव्यातून लगतच्या शेतात पाणी पाझरून पिके सडण्याची शक्यता आहे. त्यातच विंचूरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी कालव्यालगत असलेल्या शेतपिकांना धोका निर्माण झाल्याने पाटबंधारे विभागाने पालखेड धरण ओव्हरफ्लो झाल्याने कालव्याचे पाणी बंद न करता पाणी कमी प्रमाणात सोडावे. परिणामी पाण्याचा दाब कमी झाल्याने शेतकºयांचे नुकसान होणार नाही.अतिपावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावलापांडाणे : पावसाने तोंडाशी आलेले डाळिंबाचे पीक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील कोशिंबा सजेतील विजय राव आदींनी दहीवा शिवारातील गट नं. २३३ व २३६ या सुमारे २५ एकरात भगवा नावाच्या डाळिंबाची लागवड केली होती. उन्हाळ्यात टॅँकरने पाणी टाकून डाळिंंबाची झाडे वाचविली, नंतर त्यांनी डाळिंबांची छाटणी केली. तद्नंतर झाडांना योग्य खत व पाण्याचे नियोजन करून चांगल्या प्रकारचा निर्यातक्षम डाळिंब बाग तयार केली. तद्नंतर जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने तोंडाशी आलेले डाळिंबाचे पीक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात दिंडोरी तालुक्यात कोशिंबे परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यात संपूर्ण डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे. २५ एकरमध्ये दोन दिवस सह्याद्री कंपनीला निर्यातक्षम डाळिंब पाठविले व नंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण डाळिंब पीक १६० ते १७० टन माल संपूर्ण पावसाने सडले असून, ८० ते ९० लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामा करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.२५ एकर डाळिंबांची शेती उन्हाळ्यात टॅँकरने विकत पाणी आणून बाग वाचविली. त्यात डाळिंबाचे पीक निर्यातक्षम तयार करून जुलै व आॅगस्ट महिन्यात झालेल्या पिकामुळे माझे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे गांभीर्याने पाहावे.- सुभाष पवार,डाळिंब बागायतदार