शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कांद्याच्या बोगस बियाणांमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:46 IST

पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. ...

ठळक मुद्देपाळे खुर्द : शेतकऱ्याला बारा लाखांचा फटका

पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. अस्मानी संकटावर मात करत हात उसनवारी करत न्हाळी कांद्याची लागवड केली, पंरतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी सापडला आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडे लेखी तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.कळवण तालुक्यातील आसोली येथील शेतकरी भीमराव वामन देवरे यांनी २१ सप्टेंबर २०२० रोजी उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले. दोन एकरमध्ये लागवड केलेल्या कांदे ८० टक्के टोंगळे व डीरले, पोकळ निघाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.धुळे येथील एका बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रातून घेतलेल्या कांदा बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी देवरे आर्थिक संकट सापडले आहेत. संपूर्ण उन्हाळी हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्नच शून्य होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाचे त्यांचे उपजीविकेचे साधनच हिरावले गेले आहे.बियाणे खरेदी व शेती मशागतीसाठी नातेवाईकांकडून घेतलेले हात उसनवारीचे पैसे कसे फेडायचे हि विवंचना त्यांना सतावत आहे. तसेच कळवण येथील एका केंद्रातून काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले होते. मात्र लागवड केल्यानंतर ६० ते ७० दिवसानंतर कांद्याच्या पातीला टोंगळे, डीरले निघाल्याने जमिनीत कांदाच तयार झाला नाही. त्यामुळे उत्पन्न निघणार नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा व बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याबाबत तहसीलदार बी. ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी राहुल आहेर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.कोट....माझ्या शेतात २ दोन एकर बियाणाची कांदा लागवड केली आहे. मात्र ६० दिवसानंतर कांद्याला टोंगळे व डीरले निघाल्याने माझे पूर्णतः कांदा पीक वाया गेले आहे. उत्पन्न दोन एकर मध्ये बारा ट्रॅक्टर निघाले असते. चारशे क्विंटल कांदा उत्पन्न झाले असते. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.- भीमराव देवरे, शेतकरी, आसोली.चौकट...अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षदरवर्षी कोणत्या नकोणत्या कारणाने अनेक पिकांची बोगस बियाणे बाजारात विक्रीसाठी येत असतात. याबाबत शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बोगस बियाणे निघाल्याचे कळताच कृषी विभागाकडे तक्रार केली जाते, मात्र या तक्रारींची कोणतीच दखल न घेता कृषी दुकानदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो. म्हणून वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन संबंधित कृषी बियाणे विक्री केंद्रांवर व दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.कोट...शेतकऱ्याची तक्रार आली आहे. लवकरच कांदा बियाणे संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे कंपनीचे मालक, विक्रेता, तालुका कृषी अधिकारी अशी टीम जाऊन पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.- राहुल आहेर, कृषी अधिकारी, पंचायत समिती.

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी