शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 22:11 IST

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वच भागात भात शेतीसह नागली, वरई व हरभरा, मसूर, ज्वारी, मोंढ्या कोरडवाहू गहू, सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अजूनही पावसाचे सावट कायम असून पावसाची संततधार सुरूच आहे . शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीत जात असल्याने बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे. बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बहरलेला शेतीमाल वाया जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या बेमोसमी पावसाने घाट माथ्यावर स्ट्रॉबेरीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.यावर्षी देखील भात पिकाचे पुराच्या पाण्याने झालेले नुकसान, खतांचा तुटवडा व मावा, करपा, बुरशी तुडतुडा, टाका या रोगांमुळे झालेले नुकसान व यातून कसेबसे सावरून भात उत्पादक बळीराजाची धडपड सुरू असताना बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.बँकां, सहकारी संस्था, फायनान्सचे व सावकारी तसेच हात उसनवारीने घेतलेले कर्ज शेतकरी कसे फेडणार ? मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व इतर मूलभूत गरजा कशा भागविणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांचे महसूल विभाग व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. भात, नागली, वरई, उडीद, कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हरभरा, कांदा रोपे, गहू ही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.माणी येथील शेतकरी भांडू पवार, वसंत पवार यांनी शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने खराब झाला आहे. तसेच पिंपळ सोंड येथील रामदास गावित यांच्या शेतात भाताची कापणी करुन ठेवलेला भात भिजून पाण्यात तरंगत आहे. भात शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी