शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 22:11 IST

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वच भागात भात शेतीसह नागली, वरई व हरभरा, मसूर, ज्वारी, मोंढ्या कोरडवाहू गहू, सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अजूनही पावसाचे सावट कायम असून पावसाची संततधार सुरूच आहे . शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीत जात असल्याने बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे. बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बहरलेला शेतीमाल वाया जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या बेमोसमी पावसाने घाट माथ्यावर स्ट्रॉबेरीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.यावर्षी देखील भात पिकाचे पुराच्या पाण्याने झालेले नुकसान, खतांचा तुटवडा व मावा, करपा, बुरशी तुडतुडा, टाका या रोगांमुळे झालेले नुकसान व यातून कसेबसे सावरून भात उत्पादक बळीराजाची धडपड सुरू असताना बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.बँकां, सहकारी संस्था, फायनान्सचे व सावकारी तसेच हात उसनवारीने घेतलेले कर्ज शेतकरी कसे फेडणार ? मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व इतर मूलभूत गरजा कशा भागविणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांचे महसूल विभाग व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. भात, नागली, वरई, उडीद, कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हरभरा, कांदा रोपे, गहू ही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.माणी येथील शेतकरी भांडू पवार, वसंत पवार यांनी शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने खराब झाला आहे. तसेच पिंपळ सोंड येथील रामदास गावित यांच्या शेतात भाताची कापणी करुन ठेवलेला भात भिजून पाण्यात तरंगत आहे. भात शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी