शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 22:11 IST

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वच भागात भात शेतीसह नागली, वरई व हरभरा, मसूर, ज्वारी, मोंढ्या कोरडवाहू गहू, सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अजूनही पावसाचे सावट कायम असून पावसाची संततधार सुरूच आहे . शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीत जात असल्याने बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे. बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बहरलेला शेतीमाल वाया जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या बेमोसमी पावसाने घाट माथ्यावर स्ट्रॉबेरीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.यावर्षी देखील भात पिकाचे पुराच्या पाण्याने झालेले नुकसान, खतांचा तुटवडा व मावा, करपा, बुरशी तुडतुडा, टाका या रोगांमुळे झालेले नुकसान व यातून कसेबसे सावरून भात उत्पादक बळीराजाची धडपड सुरू असताना बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.बँकां, सहकारी संस्था, फायनान्सचे व सावकारी तसेच हात उसनवारीने घेतलेले कर्ज शेतकरी कसे फेडणार ? मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व इतर मूलभूत गरजा कशा भागविणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांचे महसूल विभाग व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. भात, नागली, वरई, उडीद, कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हरभरा, कांदा रोपे, गहू ही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.माणी येथील शेतकरी भांडू पवार, वसंत पवार यांनी शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने खराब झाला आहे. तसेच पिंपळ सोंड येथील रामदास गावित यांच्या शेतात भाताची कापणी करुन ठेवलेला भात भिजून पाण्यात तरंगत आहे. भात शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी