शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे ‘लाँगमार्च’, शासनाच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:30 IST

राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

नाशिक: आदिवासी विभागातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहांमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. १३) मंत्रालयावर लॉंगमार्च काढला. या माेर्चाला परवानगी नसतानाही गमिनी काव्याने नाशिकमध्ये ५०० पेक्षा अधिक आंदोलक जमले आणि त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळविला.

राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची भरती परस्पर करण्यात आली तर त्यांचे वेतन संबंधित मुख्याध्यापक, अधिक्षकानाच दयावे लागेल असे देखील पत्रक काढण्यात आल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला आहे.संबंधित निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१३) नाशिकमधून लाँगमार्च काढला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक