शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

देशात सध्या भांडवलदारांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:14 IST

भारतात निर्यातीपेक्षा आयात अधिक असल्याने देशात परदेशी चलन येण्यापेक्षा ते बाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात होत असलेली परकीय गुंतवणूक हे सरकारचे परदेशी चलन मिळविण्याचे एकमेव सर्वांत मोठे साधन असून, शेअरबाजारात निर्देशांक आपटू नये, यासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याने हे देशात सर्वसामान्य जनतेचे नव्हे, तर वित्त भांडवलदारांचे राज्य असल्याची टीका करतानाच ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तथा लेखक प्रा. अजित अभ्यंकर यांनी सरकारच्या आंतराष्ट्रीय व आर्थिक धोरणाचे वाभाडे काढले.

ठळक मुद्देअजित अभ्यंकर : दाभोलकर व्याख्यानमालेत सरकारी धोरणांचे वाभाडे

नाशिक : भारतात निर्यातीपेक्षा आयात अधिक असल्याने देशात परदेशी चलन येण्यापेक्षा ते बाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात होत असलेली परकीय गुंतवणूक हे सरकारचे परदेशी चलन मिळविण्याचे एकमेव सर्वांत मोठे साधन असून, शेअरबाजारात निर्देशांक आपटू नये, यासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याने हे देशात सर्वसामान्य जनतेचे नव्हे, तर वित्त भांडवलदारांचे राज्य असल्याची टीका करतानाच ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तथा लेखक प्रा. अजित अभ्यंकर यांनी सरकारच्या आंतराष्ट्रीय व आर्थिक धोरणाचे वाभाडे काढले.कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.२०) डॉ. नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमालेचे ५८वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर माकपचे सीताराम ठोंबरे उपस्थित होते.प्रा. अजित अभ्यंकर म्हणाले, जगभरातील गुंतवणूकदारांच्या माध्यमातून येणाऱ्या परदेशी चलनावर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू असल्याने सरकार अशा गुंतवणूकदारांचीच काळजी घेते. त्याच्याविरोधातील एक निर्णयही अर्थवस्थेला धोका निर्माण करील अशी सरकारला भीती असल्याचे त्यांनी सांगितले, तर सोन्याला उपयोगीता मूल्य नसताना केवळ विनिमय मूल्य असल्यामुळे सोन्यात गुंतवणूक म्हणजे नागरिकांचा अर्थव्यवस्थेवर अविश्वास आहे. अशा सोन्याची व मौल्यवान हिºयांची आयात सोन्याच्या साखळीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला फास असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी सोन्यावर आयातबंदी आणण्याचा पर्यायही सुचवला.दरम्यान, सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचा गैरफायदा घेऊन भांडलदार देशातील पैशाच्या मोबदल्यात परदेशात कंपन्या स्थापन करून डॉलरमध्ये संपती जमा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. सचिन गाडेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. इंडियन सिक्युरिटी प्रेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी आभार मानले.हा सरकारचा निर्लज्जपणापेट्रोल डिझेलची निर्मिती देशातच होत असताना देशातील तेलाच्या किमती कच्च्या तेलाच्या आयात दरानुसार नव्हे, तर शुद्ध पेट्रोल व डिझेल आयात करण्यास अपेक्षित अंदाजित दरांनुसार निश्चित केल्या जातात. तसेच डिझेलवर सुमारे पावणेचारपट कर आकारला जात असून, पेट्रोलवर दुप्पट कर आकारणी होत आहे. असे असताना इंधनाच्या किमती सरकारच्या नियंत्रणात नसल्याचे सांगणे म्हणजे केवळ खोटारडेपणा नसून हा निर्लज्जपणा असल्याचा घणाघात त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEconomyअर्थव्यवस्था