शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

देशात सध्या भांडवलदारांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:14 IST

भारतात निर्यातीपेक्षा आयात अधिक असल्याने देशात परदेशी चलन येण्यापेक्षा ते बाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात होत असलेली परकीय गुंतवणूक हे सरकारचे परदेशी चलन मिळविण्याचे एकमेव सर्वांत मोठे साधन असून, शेअरबाजारात निर्देशांक आपटू नये, यासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याने हे देशात सर्वसामान्य जनतेचे नव्हे, तर वित्त भांडवलदारांचे राज्य असल्याची टीका करतानाच ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तथा लेखक प्रा. अजित अभ्यंकर यांनी सरकारच्या आंतराष्ट्रीय व आर्थिक धोरणाचे वाभाडे काढले.

ठळक मुद्देअजित अभ्यंकर : दाभोलकर व्याख्यानमालेत सरकारी धोरणांचे वाभाडे

नाशिक : भारतात निर्यातीपेक्षा आयात अधिक असल्याने देशात परदेशी चलन येण्यापेक्षा ते बाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात होत असलेली परकीय गुंतवणूक हे सरकारचे परदेशी चलन मिळविण्याचे एकमेव सर्वांत मोठे साधन असून, शेअरबाजारात निर्देशांक आपटू नये, यासाठी केंद्र सरकार काम करीत असल्याने हे देशात सर्वसामान्य जनतेचे नव्हे, तर वित्त भांडवलदारांचे राज्य असल्याची टीका करतानाच ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तथा लेखक प्रा. अजित अभ्यंकर यांनी सरकारच्या आंतराष्ट्रीय व आर्थिक धोरणाचे वाभाडे काढले.कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.२०) डॉ. नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमालेचे ५८वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर माकपचे सीताराम ठोंबरे उपस्थित होते.प्रा. अजित अभ्यंकर म्हणाले, जगभरातील गुंतवणूकदारांच्या माध्यमातून येणाऱ्या परदेशी चलनावर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू असल्याने सरकार अशा गुंतवणूकदारांचीच काळजी घेते. त्याच्याविरोधातील एक निर्णयही अर्थवस्थेला धोका निर्माण करील अशी सरकारला भीती असल्याचे त्यांनी सांगितले, तर सोन्याला उपयोगीता मूल्य नसताना केवळ विनिमय मूल्य असल्यामुळे सोन्यात गुंतवणूक म्हणजे नागरिकांचा अर्थव्यवस्थेवर अविश्वास आहे. अशा सोन्याची व मौल्यवान हिºयांची आयात सोन्याच्या साखळीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला फास असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी सोन्यावर आयातबंदी आणण्याचा पर्यायही सुचवला.दरम्यान, सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचा गैरफायदा घेऊन भांडलदार देशातील पैशाच्या मोबदल्यात परदेशात कंपन्या स्थापन करून डॉलरमध्ये संपती जमा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. सचिन गाडेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. इंडियन सिक्युरिटी प्रेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी आभार मानले.हा सरकारचा निर्लज्जपणापेट्रोल डिझेलची निर्मिती देशातच होत असताना देशातील तेलाच्या किमती कच्च्या तेलाच्या आयात दरानुसार नव्हे, तर शुद्ध पेट्रोल व डिझेल आयात करण्यास अपेक्षित अंदाजित दरांनुसार निश्चित केल्या जातात. तसेच डिझेलवर सुमारे पावणेचारपट कर आकारला जात असून, पेट्रोलवर दुप्पट कर आकारणी होत आहे. असे असताना इंधनाच्या किमती सरकारच्या नियंत्रणात नसल्याचे सांगणे म्हणजे केवळ खोटारडेपणा नसून हा निर्लज्जपणा असल्याचा घणाघात त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEconomyअर्थव्यवस्था