शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सुरगाण्यात वातावरणातील बदलामुळे स्ट्रॉबेरीवर करपा, बुरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:24 IST

काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरीच्या रोपाला फूल व फळ येणाºया हप्त्यात करपा व बुरशी यामुळे येणारे फूल या वातावरणामुळे जळून जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतित आहे.

 सुरगाणा : काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे.  स्ट्रॉबेरीच्या रोपाला फूल व फळ येणाºया हप्त्यात करपा व बुरशी यामुळे येणारे फूल या वातावरणामुळे जळून जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतित आहे.  रोज महागडी औषधे फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील नुकत्याच पेरणी केलेल्या गहू, दादर, हरभरा, मसूर, वाटाणे या पिकांना हे वातावरण चांगले आहे; मात्र स्ट्रॉबेरीला २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असताना स्ट्रॉबेरी रोगाच्या कचाट्यात सापडल्याने नुकसान होत आहे.  तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरातील घोडांबे, घागबारी, सराड, उंबरपाडा, चिखली, हिरिडपाडा, खरु डे, बोरगाव, पोहळी, पासोडी, नागशेवडी, वांझुळपाडा, मोहपाडा, शिंदे व कळवण तालुक्यातील सुकापूर, खिराड, मोहपाडा, लिंगामे, आमदर, देवळीकराड, शृंगारवाडी, बापखेडा, शेपूपाडा, ततानी, दरेगाव, दळवट परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या परिसरातील हे नगदी पीक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न तसेच स्ट्रॉबेरीला दरवर्षी २०० ते २५० रु पये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळला आहे. ढगाळ वातावरण व धुके  असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास स्ट्रॉबेरी शेतीचे नुकसान होण्याची भीती स्ट्रॉबेरी उत्पादक आदिवासी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.  अशोक लक्ष्मण भोये (सरपंच) घोडांबे, ता. सुरगाणा येथील शेतकºयाने महाबळेश्वर येथून विंटर व नाभिया जातीची ९० हजारांची स्ट्रॉबेरीची ३० हजार रोपे लावली. अवकाळी पाऊस पडल्यापासून रोज महागडी औषधे फवारणी करूनही करपा व बुरशी रोग आटोक्यात येत नसल्याने निसर्गाच्या अवकृपेने झालेले नुकसान बघता कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक