शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात वातावरणातील बदलामुळे स्ट्रॉबेरीवर करपा, बुरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:24 IST

काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरीच्या रोपाला फूल व फळ येणाºया हप्त्यात करपा व बुरशी यामुळे येणारे फूल या वातावरणामुळे जळून जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतित आहे.

 सुरगाणा : काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे.  स्ट्रॉबेरीच्या रोपाला फूल व फळ येणाºया हप्त्यात करपा व बुरशी यामुळे येणारे फूल या वातावरणामुळे जळून जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतित आहे.  रोज महागडी औषधे फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील नुकत्याच पेरणी केलेल्या गहू, दादर, हरभरा, मसूर, वाटाणे या पिकांना हे वातावरण चांगले आहे; मात्र स्ट्रॉबेरीला २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असताना स्ट्रॉबेरी रोगाच्या कचाट्यात सापडल्याने नुकसान होत आहे.  तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरातील घोडांबे, घागबारी, सराड, उंबरपाडा, चिखली, हिरिडपाडा, खरु डे, बोरगाव, पोहळी, पासोडी, नागशेवडी, वांझुळपाडा, मोहपाडा, शिंदे व कळवण तालुक्यातील सुकापूर, खिराड, मोहपाडा, लिंगामे, आमदर, देवळीकराड, शृंगारवाडी, बापखेडा, शेपूपाडा, ततानी, दरेगाव, दळवट परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या परिसरातील हे नगदी पीक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न तसेच स्ट्रॉबेरीला दरवर्षी २०० ते २५० रु पये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळला आहे. ढगाळ वातावरण व धुके  असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास स्ट्रॉबेरी शेतीचे नुकसान होण्याची भीती स्ट्रॉबेरी उत्पादक आदिवासी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.  अशोक लक्ष्मण भोये (सरपंच) घोडांबे, ता. सुरगाणा येथील शेतकºयाने महाबळेश्वर येथून विंटर व नाभिया जातीची ९० हजारांची स्ट्रॉबेरीची ३० हजार रोपे लावली. अवकाळी पाऊस पडल्यापासून रोज महागडी औषधे फवारणी करूनही करपा व बुरशी रोग आटोक्यात येत नसल्याने निसर्गाच्या अवकृपेने झालेले नुकसान बघता कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक