शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

सुरगाण्यात वातावरणातील बदलामुळे स्ट्रॉबेरीवर करपा, बुरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:24 IST

काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरीच्या रोपाला फूल व फळ येणाºया हप्त्यात करपा व बुरशी यामुळे येणारे फूल या वातावरणामुळे जळून जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतित आहे.

 सुरगाणा : काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे.  स्ट्रॉबेरीच्या रोपाला फूल व फळ येणाºया हप्त्यात करपा व बुरशी यामुळे येणारे फूल या वातावरणामुळे जळून जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतित आहे.  रोज महागडी औषधे फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील नुकत्याच पेरणी केलेल्या गहू, दादर, हरभरा, मसूर, वाटाणे या पिकांना हे वातावरण चांगले आहे; मात्र स्ट्रॉबेरीला २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असताना स्ट्रॉबेरी रोगाच्या कचाट्यात सापडल्याने नुकसान होत आहे.  तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरातील घोडांबे, घागबारी, सराड, उंबरपाडा, चिखली, हिरिडपाडा, खरु डे, बोरगाव, पोहळी, पासोडी, नागशेवडी, वांझुळपाडा, मोहपाडा, शिंदे व कळवण तालुक्यातील सुकापूर, खिराड, मोहपाडा, लिंगामे, आमदर, देवळीकराड, शृंगारवाडी, बापखेडा, शेपूपाडा, ततानी, दरेगाव, दळवट परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या परिसरातील हे नगदी पीक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न तसेच स्ट्रॉबेरीला दरवर्षी २०० ते २५० रु पये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळला आहे. ढगाळ वातावरण व धुके  असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास स्ट्रॉबेरी शेतीचे नुकसान होण्याची भीती स्ट्रॉबेरी उत्पादक आदिवासी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.  अशोक लक्ष्मण भोये (सरपंच) घोडांबे, ता. सुरगाणा येथील शेतकºयाने महाबळेश्वर येथून विंटर व नाभिया जातीची ९० हजारांची स्ट्रॉबेरीची ३० हजार रोपे लावली. अवकाळी पाऊस पडल्यापासून रोज महागडी औषधे फवारणी करूनही करपा व बुरशी रोग आटोक्यात येत नसल्याने निसर्गाच्या अवकृपेने झालेले नुकसान बघता कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक