शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पत्की, चंद्रात्रे यांना संस्कृती वैभव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:21 IST

पूर्वीच्या काळात संगीताला मोठे महत्त्व दिले जायचे. त्यामुळे दिग्गज गायकही संगीतकारांच्या मदतीने दोनदा-तीनदा सराव केल्यानंतर ध्वनिमुद्रण करीत असत, परंतु नवीन पिढी अधिक उथळ झाली असून केवळ मुखडा गाण्यासाठी उभे राहतात.

नाशिक : पूर्वीच्या काळात संगीताला मोठे महत्त्व दिले जायचे. त्यामुळे दिग्गज गायकही संगीतकारांच्या मदतीने दोनदा-तीनदा सराव केल्यानंतर ध्वनिमुद्रण करीत असत, परंतु नवीन पिढी अधिक उथळ झाली असून केवळ मुखडा गाण्यासाठी उभे राहतात. तंत्रज्ञानामुळे अनावश्यक भाग काढून तो पुन्हा ध्वनिमुद्रित करता येतो, परंतु गायकाचे गीत पूर्ण होत नाही. त्यामुळे उत्कृष्ट निर्मिती होत नसल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली. संस्कृती वैभवतर्फे यंदा सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोविंदनगर येथील त्रिवेणी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी रविवारी (दि.२३) ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते संस्कृती वैभव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मानपत्र, रोख रक्कम, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी श्रीकृष्ण चंद्रात्रे व अशोक पत्की यांच्याशी संवाद साधताना श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना त्यांच्या मॉरिशस येथे रंगलेला लोकरामायण कार्यक्रम आणि आकाशवाणी व दूरदर्शनसह विविध कार्यक्रमांच्या यशस्वी प्रवासाविषयी बोलते केले. श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेताना लता मंगेशकर यांनी दिलेली दाद आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले. अशोक पत्की म्हणाले, चित्रपटांची गीते, शीर्षक गीते आणि जाहिरातींचे जिंगल्स हे सुरावटींमध्ये बसवताना लोकांना जे आवडते ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागतो. पूर्वी शब्दांवर चाल बसविण्याचे काम संगीतकार करीत होते. परंतु, सद्यस्थितीत चाल तयार करून त्यावर शब्द तयार करून घेण्यासाठी अनेजण आग्रही असल्याने आपण स्वत:च शब्दांमध्ये चाली बसविण्यास सुरुवात केल्याने आपल्यातील कवीचा उदय झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हैया’, ‘तू सप्तसूर माझे’, ‘सूर की नदीया’,‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीतांचे अशोक पत्की यांनी सादरीकरण केले. त्यास रसिकांची उत्स्फूर्त दाद दिली. प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले. आभार पल्लवी कुलकर्णी यांनी आभार मानले.साठवणीतील आठवणींना उजाळात्रिवेणी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी उत्तरार्धात आठवण एक साठवण कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासाचे विविध प्रसंग उलगडून सांगितले. ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधर फडके बाबूजी तथा सुधीर फडके यांचा सुरेल प्रवासातील विविध प्रसंगासह गदीमा व पु.ल. यांच्यातील विविध किस्से सांगतानाच या त्रयींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना सुधीर गाडगीळ यांनी बोलते केले...या मान्यवरांचाही झाला सन्मानत्रिवेणी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी समाजातील वंचितांच्या विविध घटकांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. भरत केळकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, विलास शिंदे, सचिन जोशी यांना दीपक चंदे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, तुळस व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Ashok Patkiअशोक पत्कीNashikनाशिक