शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पाटणेत अतिवृष्टीने पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:02 IST

पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून नेला. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.

पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून नेला. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.मका, बाजरी, डाळिंब, कांद्याचे रोपं, नवीन लागवड झालेले कांद्याचे अतोनात नुकसान झाले. परसूल धरणाच्या पाण्याने धोक्याच्या पातळी गाठली आहे. धरणाच्या भिंतीवरून तीन ते चार फुट पाणी वाहत असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परसुल नदी दुथडी भरून वाहू लागली असून तसेच गावाजवळील नाल्यांना पुर आल्याने आरोग्य केंद्राजवळील मातीबंधारा पूर्ण भरल्यामुळे पाटणे वाके रस्ता पाण्याखाली गेला असून बंधारा जवळील अरूण धनवट यांच्या खळ्यात पाणी शिरल्याने बाजरीचा चारा व कांद्याचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून मदत करण्याची मागणी अरूण धनवट यांनी केली आहे. परसूल नदीला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुर आला. परसुल नदीवरील जागेत गावाच्या जवळ उभारलेल्या तलाठी कार्यालयात पाणी साचले आहे. तातडीने पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी