शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने ८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By संदीप भालेराव | Updated: April 10, 2023 15:23 IST

गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.

संदीप भालेराव, नाशिक: गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे तर नुकसानीत अधिकच भर पडली असून  गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील ८ हजार ४०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात नाशिकला मोठा फटका बसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसत आहे. या पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले तर शेतामध्ये काढून ठेवलेल्या कांद्याही भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, टमाट्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १४५ गावांमधील १३, २८४ शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. द्राक्ष बागांची काढणी सुरू असल्याने अनेक बाागांना फटका बसला तर उन्हाळ कांद्याचे देखील नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगामानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले होते यंदा देखील अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस