शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अवकाळी पावसाने ८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By संदीप भालेराव | Updated: April 10, 2023 15:23 IST

गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.

संदीप भालेराव, नाशिक: गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे तर नुकसानीत अधिकच भर पडली असून  गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील ८ हजार ४०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात नाशिकला मोठा फटका बसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसत आहे. या पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले तर शेतामध्ये काढून ठेवलेल्या कांद्याही भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, टमाट्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १४५ गावांमधील १३, २८४ शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. द्राक्ष बागांची काढणी सुरू असल्याने अनेक बाागांना फटका बसला तर उन्हाळ कांद्याचे देखील नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगामानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले होते यंदा देखील अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस