शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 01:34 IST

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण : १४७ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

नाशिक : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

सप्टेंबरअखेरच्या चरणात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जिरायत, बागायत वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, तर येवला तालुक्यातही नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यात ५८ हजार २९६ हेक्टर, तर नांदगावमधील ५२ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर पाणी फिरले. येवला तालुक्यातील ५६ हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

मालेगाव, नांदगाव तालुक्यांसह येवला, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. भुईमूग, सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ, नागली ही पिके आडवी झाली; तर केळी, चिक्कू, निंबू, आंबा, द्राक्ष, डाळिंब फळपिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनाम्याला गती देण्यात आली. आठ तालुक्यांतील ६४७ गावांतील १ लाख ७१ लाख हेक्टरवरील जिरायत, बागायत, वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला असून, १४७ कोटी २१ लाखांची मदत मागितली आहे.

 

--इन्फो--

बाधित नुकसानभरपाईची मागणी (निधी लाखात)

१) जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ८९५७.०१

२) बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ४३६७ : ९८

३) वार्षिक फळपिके : १८.३५

४) बहुवार्षिक फळपिके : १३७७.९९

एकुण : १४७२१.३३

--इन्फो--

दोन लाख शेतकरी बाधित

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना बसला. सर्वाधिक नुकसान हे जिरायती पिकांखालील क्षेत्राचे झाले, तर वार्षिक फळपिकांनादेखील काही प्रमाणात फटका बसला. बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १, ७१, ८६७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभाग