शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 01:34 IST

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण : १४७ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

नाशिक : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

सप्टेंबरअखेरच्या चरणात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जिरायत, बागायत वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, तर येवला तालुक्यातही नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यात ५८ हजार २९६ हेक्टर, तर नांदगावमधील ५२ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर पाणी फिरले. येवला तालुक्यातील ५६ हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

मालेगाव, नांदगाव तालुक्यांसह येवला, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. भुईमूग, सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ, नागली ही पिके आडवी झाली; तर केळी, चिक्कू, निंबू, आंबा, द्राक्ष, डाळिंब फळपिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनाम्याला गती देण्यात आली. आठ तालुक्यांतील ६४७ गावांतील १ लाख ७१ लाख हेक्टरवरील जिरायत, बागायत, वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला असून, १४७ कोटी २१ लाखांची मदत मागितली आहे.

 

--इन्फो--

बाधित नुकसानभरपाईची मागणी (निधी लाखात)

१) जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ८९५७.०१

२) बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ४३६७ : ९८

३) वार्षिक फळपिके : १८.३५

४) बहुवार्षिक फळपिके : १३७७.९९

एकुण : १४७२१.३३

--इन्फो--

दोन लाख शेतकरी बाधित

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना बसला. सर्वाधिक नुकसान हे जिरायती पिकांखालील क्षेत्राचे झाले, तर वार्षिक फळपिकांनादेखील काही प्रमाणात फटका बसला. बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १, ७१, ८६७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभाग