शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 01:34 IST

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण : १४७ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

नाशिक : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

सप्टेंबरअखेरच्या चरणात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जिरायत, बागायत वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, तर येवला तालुक्यातही नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यात ५८ हजार २९६ हेक्टर, तर नांदगावमधील ५२ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर पाणी फिरले. येवला तालुक्यातील ५६ हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

मालेगाव, नांदगाव तालुक्यांसह येवला, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. भुईमूग, सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ, नागली ही पिके आडवी झाली; तर केळी, चिक्कू, निंबू, आंबा, द्राक्ष, डाळिंब फळपिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनाम्याला गती देण्यात आली. आठ तालुक्यांतील ६४७ गावांतील १ लाख ७१ लाख हेक्टरवरील जिरायत, बागायत, वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला असून, १४७ कोटी २१ लाखांची मदत मागितली आहे.

 

--इन्फो--

बाधित नुकसानभरपाईची मागणी (निधी लाखात)

१) जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ८९५७.०१

२) बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ४३६७ : ९८

३) वार्षिक फळपिके : १८.३५

४) बहुवार्षिक फळपिके : १३७७.९९

एकुण : १४७२१.३३

--इन्फो--

दोन लाख शेतकरी बाधित

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना बसला. सर्वाधिक नुकसान हे जिरायती पिकांखालील क्षेत्राचे झाले, तर वार्षिक फळपिकांनादेखील काही प्रमाणात फटका बसला. बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १, ७१, ८६७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभाग