शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

एकलहरे परिसरात पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:31 IST

परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा ४१ अंशांवर गेल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी सर्वच उन्हापासून बचाव करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पिके करपू लागली असून, विद्युतपुरवठा बंद असल्याने पिकांना पाणी नाही.

एकलहरे : परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा ४१ अंशांवर गेल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी सर्वच उन्हापासून बचाव करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पिके करपू लागली असून, विद्युतपुरवठा बंद असल्याने पिकांना पाणी नाही.शेतकरी शेतीची कामे सकाळी १० च्या आत व दुपारी चारनंतर करतात. ज्यांनी ठोक पद्धतीने कामे घेतली आहेत, असे शेतमजूर अंगात सनकोट, डोक्याला स्कार्फ बांधून शक्यतो सावलीचा आडोसा करून कामे करतात. व्यापारी आपली दुकाने दुपारी चारनंतर उघडतात. कडकडीत उन्हामुळे दुपारच्या वेळी सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. एखादी आइस्क्र ीम किंवा कुल्फी विक्रे त्याची गाडी रस्त्यावर फिरताना दिसते. एकलहरे परिसरात सध्या उन्हाळ्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत नव्हता एवढा कडक उन्हाळा यावर्षी आहे, असे वयस्कर मंडळी सांगतात. कडक उन्हाच्या काहिलीमुळे गुरे-ढोरे झाडांच्या सावलीत विसावलेली दिसतात. परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढा, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या सर्व भागात भरदुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. परिसरात दारणा व गोदावरी नदीला पाणी सोडले असले, तरी नदीकाठच्या मोटारींचा विद्युतपुरवठा बंद केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. काही ठिकाणी विहिरी व शेततळ्यांना पाणी आहे, परंतु विजेचा पुरवठा दिवसा न देता रात्रीच्या वेळी दिला जातो. एकलहरे परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी रात्री शेताला पाणी देण्यासाठी जायला घाबरतात. त्यामुळे असून अडचण, नसून खोळंबा अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. विजेचा पुरवठा रात्री न देता दिवसा ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाण्याअभावी टमाटे, भुईमूग, जनावरांसाठीचा चारा होरपळू लागला आहे. कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उपरणे, टोप्या, स्कार्फ, छत्री, सनकोट, गॉगल आदी साधनांचा वापर करताना आढळतात. हातगाड्यांवर थंड पाण्याच्या बाटल्या, उसाचा रस, फळांचा ज्यूस, थंडगार टरबुजाच्या फोडी, ताक, लस्सी, लिंबूपाणी आदींना मागणी वाढली आहे.एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी परिसरात उन्हाचा दाह वाढल्याने व विजेचा लपंडाव सुरू असल्याने ही संधी साधून चोरट्यांच्या अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोºया वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यात सामनगावात धाडसी घरफोडी करण्यात आली.उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना गोवर, कांजिण्या, डायरिया यांसारखे आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. सध्या उन्हाचा कडाका तीव्र वाढल्याने तापमान ४१ अंशांवर गेले आहे. अशा वातावरणात सगळ्यांनीच काळजी घेणे अत्यावश्यक आहे. भर दुपारी उन्हात फिरणे टाळावे, डोक्यावर टोपी, रु माल, उपरणे बांधावे. उन्हात काम करताना किंवा बाहेर जाताना अनेकदा उष्माघाताचा त्रास होतो. मळमळ, चक्कर येणे, डोकेदुखी, ताप, धडधड होणे अशी प्राथमिक स्वरूपाची लक्षणे दिसू शकतात. अशावेळी घरात किंवा सावलीत बसावे. संजीवनी जलाचा पेय म्हणून वापर करावा.- डॉ. महेंद्र गाडेकर, सामनगाव

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी