शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात दुष्काळ पाहणीसाठी पीक कापणी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:58 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली.

ठळक मुद्देमार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला पीक कापणी प्रयोगाचे आदेश दिल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. १८ सप्टेंबर रोजी सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पर्जन्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरकरांनी मोर्चा काढला होता. दुष्काळी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने व दुष्काळाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी नांदगाव ,मालेगाव, सिन्नर तालुक्यात पीक कापणीचे प्रयोग तातडीने राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात जिल्हाधिकारी यांना दिले. माजी आमदार कोकाटे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री यांना म्हटले आहे की ,सिन्नर तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून प्रशासनाने शासन निर्णयानुसार सर्वेक्षण करून उपाय योजना करण्याबाबत विनंती केली होती. पर्जन्यमानात ३ ते ४ आठवडे खंड पडल्याने ७५ % पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठलेही सर्वेक्षण अद्याप केले नाही. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन पाच मागण्या कोकाटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. तालुक्यात चारा छावण्या, मागेल त्या गावाला पाणी टँकर, शेतपंपाची वीजबिल माफी, विद्यार्थ्यांची फी माफी, मार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश आहे.मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर जिल्हा यंत्रणा गतिमान झाली आहे. सिन्नरसह इतर टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिले आहेत. तालुक्यातील प्रत्येकी १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करत तिथे हे प्रयोग राबवण्यात येणार आहेत. सदर अहवाल शक्य तितक्या लवकर राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून, राज्य स्तरावर टंचाई घोषित करून त्याचा अहवाल केंद्राकडे मदतीसाठी सादर करीत मागणी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.