शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

सिन्नर तालुक्यात दुष्काळ पाहणीसाठी पीक कापणी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:58 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली.

ठळक मुद्देमार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला पीक कापणी प्रयोगाचे आदेश दिल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. १८ सप्टेंबर रोजी सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पर्जन्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरकरांनी मोर्चा काढला होता. दुष्काळी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने व दुष्काळाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी नांदगाव ,मालेगाव, सिन्नर तालुक्यात पीक कापणीचे प्रयोग तातडीने राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात जिल्हाधिकारी यांना दिले. माजी आमदार कोकाटे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री यांना म्हटले आहे की ,सिन्नर तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून प्रशासनाने शासन निर्णयानुसार सर्वेक्षण करून उपाय योजना करण्याबाबत विनंती केली होती. पर्जन्यमानात ३ ते ४ आठवडे खंड पडल्याने ७५ % पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठलेही सर्वेक्षण अद्याप केले नाही. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन पाच मागण्या कोकाटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. तालुक्यात चारा छावण्या, मागेल त्या गावाला पाणी टँकर, शेतपंपाची वीजबिल माफी, विद्यार्थ्यांची फी माफी, मार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश आहे.मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर जिल्हा यंत्रणा गतिमान झाली आहे. सिन्नरसह इतर टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिले आहेत. तालुक्यातील प्रत्येकी १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करत तिथे हे प्रयोग राबवण्यात येणार आहेत. सदर अहवाल शक्य तितक्या लवकर राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून, राज्य स्तरावर टंचाई घोषित करून त्याचा अहवाल केंद्राकडे मदतीसाठी सादर करीत मागणी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.