शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सिन्नर तालुक्यात दुष्काळ पाहणीसाठी पीक कापणी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:58 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली.

ठळक मुद्देमार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला पीक कापणी प्रयोगाचे आदेश दिल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. १८ सप्टेंबर रोजी सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पर्जन्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरकरांनी मोर्चा काढला होता. दुष्काळी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने व दुष्काळाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी नांदगाव ,मालेगाव, सिन्नर तालुक्यात पीक कापणीचे प्रयोग तातडीने राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात जिल्हाधिकारी यांना दिले. माजी आमदार कोकाटे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री यांना म्हटले आहे की ,सिन्नर तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून प्रशासनाने शासन निर्णयानुसार सर्वेक्षण करून उपाय योजना करण्याबाबत विनंती केली होती. पर्जन्यमानात ३ ते ४ आठवडे खंड पडल्याने ७५ % पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठलेही सर्वेक्षण अद्याप केले नाही. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन पाच मागण्या कोकाटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. तालुक्यात चारा छावण्या, मागेल त्या गावाला पाणी टँकर, शेतपंपाची वीजबिल माफी, विद्यार्थ्यांची फी माफी, मार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश आहे.मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर जिल्हा यंत्रणा गतिमान झाली आहे. सिन्नरसह इतर टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिले आहेत. तालुक्यातील प्रत्येकी १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करत तिथे हे प्रयोग राबवण्यात येणार आहेत. सदर अहवाल शक्य तितक्या लवकर राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून, राज्य स्तरावर टंचाई घोषित करून त्याचा अहवाल केंद्राकडे मदतीसाठी सादर करीत मागणी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.