शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

एरंडगाव परिसरात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:12 IST

एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत.

एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आभाळात सदैव पावसाचे काळे ढग दिसतात. मधूनमधून पावसाच्या सरी येत असतात. क्वचितच सुर्य दर्शन होते. संततधारेमुळे सगळीकडे दलदल निर्माण झाली आहे. पिकांच्या पोषणासाठी उन्हाची गरज असते पण ऊन पडतच नाही. मूग, बाजरी ही पिके अनेक दिवसांपासून काढणीस आली आहेत. सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामूळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्तम प्रतीचा मूग बाजारात सात हजार रु पये क्विंटल च्या दरम्यान विकला जातो तर काळसर मुगास फक्त हजार पंधराशाचा भाव मिळतो.भाजीपालाही सडून जात आहे. सोंगणीस आलेली बाजरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. सोयाबीन पिवळे पडले आहे. चाळीतील कांदे सडू लागले आहे. शेतीची मशागत करणे, पिकांंची निगा राखणे, औषधे, खते टाकने हे शेतकर्यांच्या हाती आहे पण नैसिर्गक हानी व बाजारभावतील घसरण शेतकर्?यांच्या हाती नसल्याने भांडवल खर्च करून व रात्रंदिवस कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. एक संकट पार केले की दुसरे संकट वाट आडवते त्यामूळे दिवसेंदिवस शेतकर्यांचे शारिरीक, मानिसक व आर्थीक बळ खचत चालले आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दत्तु वावधने, लहानू बारहाते, विट्ठल जगताप, शिवाजी खापरे, काकासाहेब पडोळ, देवीदास उराडे आदींनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती