शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोरोना संकटावर तोडगा : शेतकरी, व्यापाऱ्यांच्या संगनमताने रानमाळावर पर्यायी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:44 IST

मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर  गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा कृषिमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील विविध भागांतील किरकोळ विक्रेत्यांनाही व्यवसायात अडचणी येत असल्याने त्यांनीही महामार्गालगतच्या माळरानावर दुकाने लावली आहे.

ठळक मुद्देशेतकरी, व्यापाऱ्यांनी रानमाळावर सुरू केला बाजार मुंबई-आग्रा महामार्गालगत कृषीमालाचे व्यावहार

नाशिक : रायगडनगर ते वाडीवऱ्हे दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर  गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा कृषिमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील विविध भागांतील किरकोळ विक्रेत्यांनाही व्यवसायात अडचणी येत असल्याने त्यांनीही महामार्गालगतच्या माळरानावर दुकाने लावली असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी या भागात पर्याय बाजार उभार राहिला आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यवहारांवर निर्बंध आले होते. त्यामुळे पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबेबहुला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरांतील शेतकऱ्यांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यवहारांना बाजाराचे स्वरूप येऊन मोठ्या प्रमाणात कृषी मालाची उलाढाल होऊ लागली असून, शेतक ºयांनाही कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे बाजार सुरू करताना शेतकरी व व्यापाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईचाही सामना करावा लागला. परंतु, मोकळ्या माळरानावर शेतकऱ्यांनी परस्परांमध्ये अधिक अंतर राखून व्यवहार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून, येथे रोख स्वरूपातील कृषिमाल खरेदी विक्रीचे व्यवाहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. 

शेतकऱ्यांवर कारवाई, पर्यटकांकडे कानाडोळा गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत काही प्रमाणात पालेभाज्या आवक घटल्याने पालेभाज्याही महागल्या होत्या. तर दुसरीकडे शेतातील पिकांचे बाजार उपलब्ध होत नसल्याने नुकसान होत होते. त्यामुळे शेतकरी अशा पर्यायी ठिकाणांवर कृषी मालाची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतमालाची विक्री कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे याच भागातील टेकड्यांवर श्रावणसरींनी पसरलेल्या हिरवळीवर सहलीचा आनंद घेणाºया पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यांच्याकडे मात्र पोलिसांकडून कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रायगडनगर समोरील टेकडी लष्करी हद्दीला लागून असतानाही या ठिकाणी साप्ताहिक सुटीच्या दिवशी शहरवासीयांचे अक्षरश: लोंढेच येत असताना स्थानिक पोलिसांचे त्याक डे मात्र दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरीMarketबाजार