शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:03 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी वर्गावरील दुबार पेरणीचे ...

ठळक मुद्देपावसाची दमदार हजेरी :बळीराजांच्या आशा पल्लवित

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी वर्गावरील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे.लखमापूर व परिसरात आषाढी एकादशी नंतर पाऊस गावब झाला होता. दिंडोरी तालुक्याला संपूर्ण नाशिक जिल्ह्यात द्राक्षे पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु कोरोना व कमी भाव यामुळे या द्राक्षे पंढरीला संकटमय स्वरु प प्राप्त झाले आहे. रब्बी हंगाम गेला. आता सर्व तयारी व आशा ठेवून बळीराजां खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी तयारीला लागला. परंतु खरीप हंगामाची पहिली संकटमय सुरु वात झाली ती बियाने खरेदीपासून, कारण लॉक डाऊनची स्थिती असल्यामुळे दुकाने बंद असायची. तरी पण मिळेल त्या ठिकाणाहून महागडी बियाने शेतकरी वर्गाने खरेदी केली. व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरणीला सुरु वात केली. परंतु पुढे पावसाने लहरीपणा दाखवत दडी मारली. आषाढी एकादशी नंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या व पिकांना जीवदान मिळाले. आता शेतातून अंकुर काढु लागले. परंतु काही बियाणांची उगवण झाली नाही. तर काहींची उगवण झाली. त्यामुळे बळीराजांच्या समोर खराब बियाणे निघाल्याचे संकट निर्माण झाले.परंतु काही बियाने मात्र चांगले उगवले. पिके जोमाने जमिनीतुन वर येत असतांना पुन्हा पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पिके पाण्याअभावी करपू लागली. तेव्हा मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन वेगवेगळी पिके घेतली. आता एक दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस झाल्याने बळीराजांच्या समोरील दुबार पेरणी चे संकट टळले आहे.कृत्रिम संकट..खरीप हंगाम करीत असतांना बळीराजांवर अस्मानी व सुलतानी संकटाबरोबर आता नवीन कृत्रिम संकट आले आहे. ते म्हणजे युरिया खताचा तुटवडा. बुकिंग करून ही युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. शासनाने आदेश काढून ही शेतकरी वर्गाला खताचा तुटवडा येणे ही चिंतेची बाब आहे. असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस