शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

नागरी बॅँकांपुढील संकट कायम

By admin | Updated: November 16, 2016 22:39 IST

नोटा बदलाचा परिणाम : ठेवायला नाही जागा, वाटपाला नाही नोटा

नाशिक : केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नागरी सहकारी बॅँकांपुढे गेल्या सात दिवसांपासून निर्माण झालेले प्रश्न आजही कायम असून, खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर हजार, पाचशेच्या नोटा बॅँकात जमा केल्याने त्या ठेवायला जागा शिल्लक नाही, तर खातेदारांना त्यांच्या खात्यातून काढण्यासाठी बॅँकेकडे पैसेच शिल्लक नसल्याची बाब आज बॅँकांच्या अध्यक्षांनी प्रशासनाच्या कानावर घातली, मात्र आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरी निराशाच पडली. सरकारने चलनातून बाद केलेल्या हजार व पाचशेच्या नोटा नागरिकांना त्यांच्या बॅँक व पोस्ट खात्यात डिपॉझिट करण्याची मुभा दिल्याने राष्ट्रीयिकृत बॅँकांप्रमाणे नागरी बॅँकांमध्येही गेल्या बुधवारपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजार व पाचशे रुपयांच्या नोटा भरण्यास सुरुवात केली. एकीकडे नोटांचा भरणा तर दुसरीकडे त्या बदल्यात चलनातील नोटा घेण्यासाठी खातेदारांनी गर्दी केली. परंतु नागरी बॅँकांच्या चेस्ट बॅँकांनी गेल्या सात दिवसांत नागरी बॅँकांना त्यांच्या मागणीप्रमाणे चलनाचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरी बॅँकांवर ग्राहकांचा दबाव वाढत चालला असून, दुसरीकडे नागरी बॅँकांच्या भरण्यामध्ये प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांचा स्वीकार करण्यास स्टेट बॅँकेनेही नकार दिला आहे. अशा प्रकारे दुहेरी चरख्यात सापडलेल्या जिल्ह्यातील नागरी बॅँकांच्या अध्यक्षांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांना नागरी बॅँक असोसिएशनने निवेदन सादर केले. त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले व या संदर्भात अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याशी चर्चा करण्याची सूचना केली. बगाटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्टेट बॅँक तसेच रिझर्व्ह बॅँकेच्या मुंबईच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या निदर्शनास नागरी बॅँकांची उपरोक्त अडचण लक्षात आणून दिल्यावर त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील नागरी बॅँकांकडे जमा झालेले डिपॉझिट व त्यांच्याकडे होत असलेली मागणी याची माहिती सायंकाळपर्यंत स्टेट बॅँकेकडे ई-मेलद्वारे जमा करण्याची सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत नागरी बॅँकेचे भास्करराव कोठावदे, विश्वास ठाकूर, माधवराव पाटील, रंजन ठाकरे, अजय ब्रह्मेचा, दत्ता गायकवाड, रामलाला सानप, शशीताई अहिरे, नाना सोनवणे, भालचंद्र कोठावदे, पंकज पारख, अशोक व्यवहारे, अशोक झंवर, मिर्झा बेग, शांताराम काटकर आदिंनी भाग घेतला. (प्रतिनिधी)