शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पहिली, आठवी, दहावीचा बदलणार अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:19 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा व हवाहवासा वाटणारा अभ्यासक्रम येऊ घातला असून, त्या धर्तीवर पाठ्यपुस्तकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीसह आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक पडणार आहे.

पेठ : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा व हवाहवासा वाटणारा अभ्यासक्रम येऊ घातला असून, त्या धर्तीवर पाठ्यपुस्तकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीसह आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक पडणार आहे.  शालेय अभ्यासक्रमामध्ये नावीन्यता, विविध तंत्रज्ञान, अ‍ॅक्टिबेस लर्निंग, डिजिटीलायझेशन आणि घोकंपट्टी जाऊन उपक्रमशीलता, शालेय मूल्य व स्वयंअध्ययनाची सवय जोपासली जावी यासाठी आता यंदा इयत्ता आठवी आणि दहावीप्रमाणेच पहिलीचेही पाठ्यपुस्तक नव्याने तयार करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षातच (२०१८-१९) त्यानुसार आठवी आणि दहावीबरोबरच पहिलीची नवी पाठ्यपुस्तके बाजारात येणार आहेत, तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी आणि अकरावीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत.  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती पूर्ण होते, तोच हे नवे धडे गिरवले जात आहेत. राज्यात २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार २०१३ पासून नवी पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. दरवर्षी टप्प्याटप्प्याने एकेका इयत्तेचे पुस्तक बदलण्यात आले. त्यानुसार यंदा आठवी आणि दहावीची नवी पुस्तके लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला.  मात्र त्याचबरोबर आता यंदाच पहिलीचेही पुस्तक बदलण्यातयेणार आहे. सध्या असलेली पहिलीची पुस्तक २०१३ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यात काही बदल करून २०१६ मध्ये पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले. अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्व पुस्तके लागू होण्यापूर्वीच यंदापासून पहिलीचे पुस्तक बदलून पाठ्यपुस्तके बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.  पुढील वर्षी (२०१९) इयत्ता दुसरी, तिसरी व अकरावीची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्राकडून (बालभारती) पाठ्यपुस्तक विक्रे त्यांना जुनी पुस्तके बदण्याची विनंती करणारे पत्र बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी पाठविले आहे. जुनी पुस्तके बालभारतीकडे जमा करण्याच्या सूचनाही वितरक व दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.एप्रिल २०१६ मध्ये पूर्वीच्या सरकारच्या कालावधीत तयार करण्यात आलेले सर्व अभ्यास मंडळे बरखास्त करत एकाच अभ्यास मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याबरोबर २०१६ मध्ये बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम काढून ते विद्या प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर पाचवीपासूनची पुस्तके ही नव्या अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात आली होती. गेल्या वर्षी अभ्यास मंडळात बदल करत काही सदस्यांना काढून नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली.आगामी शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचे धोरण महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांनी केले असून, भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकात क्यूआर कोडचा उपयोग करण्यात येणार असल्याने शिक्षकांना प्रोजेक्टच्या माध्यमातून अधिक प्रभावी अध्यापन करणे शक्य होणार आहे. म्हणून राज्यातील प्रत्येक शिक्षकाने टेक्नोसेव्ही होण्याची गरज आहे.  - डॉ. सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, मुंबई

टॅग्स :Schoolशाळा