शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

मुलांच्या एकाग्रता वाढीसाठी राज्यातील शाळांमध्ये समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:47 IST

वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे.

नाशिक : वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे.  चंचलता हा बालकांचा स्थायीभाव असून, वाढत्या वयानुसार मुले एकाग्र होऊन अभ्यासाकडे वळतात, हाच त्यांच्या जीवनाचा पाया असतो, असे बालमानसशास्त्रज्ञ स्पष्ट करतात. परंतु आजच्या काळात भरमसाठ इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळे वाढत्या वयातही मुलांच्या अंगी असलेली चंचलता कायम राहून कोणत्याही एका गोष्टीत त्यांचे लक्ष लागत नाही. कालांतराने त्यांच्या मनात नैराश्य निर्माण होऊन साहजिकच अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. त्यातून अपयश येण्याचा धोका वाढतो. या समस्येवर मात करण्यासाठी मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेने राज्यभरातील शाळांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य समुपदेशन तसेच मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शाळांमधील शिक्षकांना या उपक्र मात सहभागी करून घेतले जात आहे. त्यांनाही यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्या मुलांच्या बाबतीत वारंवार नैराश्यसारखी गंभीर समस्या असेल त्यांच्या पालकांसाठीदेखील अभ्यास वर्ग व कार्यशाळा घेण्यात येत आहेत. मनशक्ती प्रयोग केंद्राचे मुख्य कार्यालय लोणावळा येथे आहे. नाशिक शहरातील रचना विद्यालय, पुरु षोत्तम हायस्कूल, स्वामी विवेकानंद आदी शाळांमध्ये तीन ते पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा, समुपदेशन वर्ग घेतल्याचे केंद्राच्या समन्वयकांनी सांगितले.राज्यभरात ५० शहरांमध्ये उपक्रमराज्यभरातील ५० शहरांत विविध ठिकाणी असलेल्या उपकेंद्रातील अनेक कार्यकर्ते गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्र म राबवित आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक आदी शहरांमधील शाळांमध्ये मनशक्ती केंद्राने राबवलेल्या मुलांच्या बाबतीत उपक्र मांचा सकारात्मक बदल घडून आला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी