शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

त्र्यंबकेश्वरला पाणी मीटर बसविण्यास नगरसेवकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:53 IST

त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : मुख्याधिका-यांवर लाभाचा संशय

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. नगरपालिकेने ठराव करून पाणी मीटरला विरोध केलेला असतानाही मुख्याधिकाºयांनी त्यासाठी निविदा काढल्यामुळे यात त्यांचा वैयक्तिक लाभ असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही ही वस्तुस्थिती असताना मुख्याधिकाºयांनी मीटरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नगरपालिकेच्या ३ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी ठरावाद्वारे त्यास विरोध केला आहे. शहरातील नागरिकांना महागड्या दराने पिण्याचे पाणी परवडणारे नाही. नगरपालिकेस नगर विकास सप्ताहाच्या निमित्ताने अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून नागरिक व भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मुख्याधिकाºयांकडून या अडीच कोटी रुपयांचा वापर महागडे पाणी मीटर खरेदी करण्यासाठी केला जात आहे. त्यासाठी त्यांनी जाहिरात देऊन निविदाही मागविल्या आहेत. पाणी मीटर बसविण्यास जिल्हाधिकाºयांची संमती असल्याचे दाखवून दिशाभूल केली जात असून, नगरपालिकेच्या संपत्तीचा आपल्या अट्टहासासाठी दुरुपयोग केला जात असल्याचे म्हटले आहे. नगरपालिकेने २५ ते ३० नागरिकांना २४ तास स्पेशल कनेक्शन दिले आहे; मात्र अद्याप त्यांना तासभरदेखील पाणी मिळालेले नाही. यापूर्वीही नागरिकांना दीड हजार रुपयांप्रमाणे पाणी मीटर घेण्यास भाग पाडले होते. त्या मीटरचे काय झाले याची चौकशी करावी व मीटर योजना लागू करू नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्निल शेलार, अनिता बागुल, विष्णू दोबाडे, शिल्पा रामायणे, शीतल उगले, कैलास चोथे, माधवी भुजंग, सायली शिखरे, संगीता भांगरे, भारती बदादे, सागर उजे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक