शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

निफाड तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:49 IST

शेतकरी हवालदिल : पंचनामे करण्याची मागणी

ठळक मुद्देवर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला

सायखेडा : निफाड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तळवाडे, महाजनपुर, पिंपळगाव निपाणी, बागलवाडी,औरंगपूर या गावातील शेतक-यांनी केली आहे. यासंदर्भात शेतक-यांनी निफाड तहसील कार्यालयाला नवेदन दिले आहे.निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील सदर गावे कमी पर्जन्य छायेत येतात. आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी असते. वर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. पाऊस कमी आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने जमीन असूनही पाण्याअभावी पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यांना दिलासा म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. सोयाबीन, मका, टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतात मोठया प्रमाणावर भांडवली खर्च करून शेतक-यांनी उभी केली. एकरी ६० ते ७० हजार रु पये खर्च करूनही पिके हाती येत नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, यासंदर्भात निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यासाठी शेतकरी गेले असता तहसीलदार उपस्थित नसल्याने कार्यालयात लिपिकांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरपंच लता सांगळे, माजी सरपंच राजेंद्र सांगळे, बचवंत फड, देविदास खाडे, जयराम सांगळे, संदीप फड ,भाऊसाहेब फड यासह शेतकरी उपस्थित होतेनुकसान भरपाई द्यावीतळवाडे ,महाजनपुर, निपाणी पिंपळगाव या भागातील नगदी पिके पाण्याअभावी करपून गेल्याने भांडवल वाया गेले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- राजेंद्र सांगळे, तळवाडे

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस