शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निफाड तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:49 IST

शेतकरी हवालदिल : पंचनामे करण्याची मागणी

ठळक मुद्देवर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला

सायखेडा : निफाड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तळवाडे, महाजनपुर, पिंपळगाव निपाणी, बागलवाडी,औरंगपूर या गावातील शेतक-यांनी केली आहे. यासंदर्भात शेतक-यांनी निफाड तहसील कार्यालयाला नवेदन दिले आहे.निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील सदर गावे कमी पर्जन्य छायेत येतात. आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी असते. वर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. पाऊस कमी आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने जमीन असूनही पाण्याअभावी पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यांना दिलासा म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. सोयाबीन, मका, टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतात मोठया प्रमाणावर भांडवली खर्च करून शेतक-यांनी उभी केली. एकरी ६० ते ७० हजार रु पये खर्च करूनही पिके हाती येत नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, यासंदर्भात निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यासाठी शेतकरी गेले असता तहसीलदार उपस्थित नसल्याने कार्यालयात लिपिकांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरपंच लता सांगळे, माजी सरपंच राजेंद्र सांगळे, बचवंत फड, देविदास खाडे, जयराम सांगळे, संदीप फड ,भाऊसाहेब फड यासह शेतकरी उपस्थित होतेनुकसान भरपाई द्यावीतळवाडे ,महाजनपुर, निपाणी पिंपळगाव या भागातील नगदी पिके पाण्याअभावी करपून गेल्याने भांडवल वाया गेले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- राजेंद्र सांगळे, तळवाडे

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस