शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला बोंडअळीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:50 IST

वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयुक्त मानली जात असताना, हीच थंडी आता हाताशी आलेल्या कापूस पिकासाठी मारक ठरण्याची भीती कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असून, थंडीचे प्रमाण वाढल्यास कापसावर पडणाऱ्या बोंड अळीसाठी पोषक ठरत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून निष्पन्न झाल्याने शेतातील उभे पीक संकटात सापडल्यामुळे राज्यातील कृषी खात्यानेही चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देथंडी : उत्पादक, कृषिखात्याला धडकी; नुकसानीची भीती

नाशिक : वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयुक्त मानली जात असताना, हीच थंडी आता हाताशी आलेल्या कापूस पिकासाठी मारक ठरण्याची भीती कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असून, थंडीचे प्रमाण वाढल्यास कापसावर पडणाऱ्या बोंड अळीसाठी पोषक ठरत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून निष्पन्न झाल्याने शेतातील उभे पीक संकटात सापडल्यामुळे राज्यातील कृषी खात्यानेही चिंता व्यक्त केली आहे.जिल्ह्णातील येवला, नांदगाव, सिन्नर या भागांतील कपाशीचे पिकाचे बोंडे पक्व होऊन कापूस वेचणी योग्य होत आहे. नेमक्या त्याच वेळी थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने कापूस उत्पादकांना धडकी बसली आहे. या वर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यापर्यंत सरासरी दिवसाचे तपमान ३५ अंश सेल्सियस असल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. परंतु आता यापुढे तपमान जस जसे कमी होत जाईल तशी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात वाढ होणार असल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे.आर्द्रता बोंडअळीला पोषकनाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचे तपमान ११ ते १४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले असल्यामुळे दिवसाची आर्द्रता ७१ ते ८० टक्के व रात्रीची आर्द्रता २६ ते ३५ टक्के इतकी आहे. नेमकी हीच बाब कापसावर मारा करणाºया बोंडअळीला पोषक मानली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस