शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा परतीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मृत्यूदर देखील १.८९ ...

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मृत्यूदर देखील १.८९ टक्के इतका खाली आला आहे. सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे या आकडेवारीवरून दि्सून येत असले तरी नागरिकांना अजूनही खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी सुरक्षितता नियमांचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नांतून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत २ लाख ६५ हजार ३५० रुग्णांपैकी २ लाख ५७ हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३ हजार ०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ५ हजार ३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के आहे, तर मृत्युदर १.८९ टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ दिली.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख १३ हजार ८३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख १० हजार ४९२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्या आले आहे. सद्यस्थितीत एक हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात दोन हजार ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगांव जिल्ह्यात ५६ हजार ६६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५४ हजार ८१२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५०४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या जिल्ह्यात आजपर्यंत १,३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

धुळे जिल्ह्यात १४ हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी १४ हजार १५३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. सध्या केवळ १६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्के इतके आहे. अहमदनगर जिल्ह्यात ७० हजार ९२३ कोरोनाबाधित रूग्ण समोर आले तर दुसरीकडे ६९,४३३ रूग्ण बरेदेखील झाले आहेत. १ हजार ८१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के इतके आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ९,२३२ पैकी ८,४२० रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. ६२४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२० टक्के इतके आहे.

--इन्फो--

विभागात ४,३६९ होम क्वारंटाईन

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ११ लाख ३३ हजार ५८६ अहवाल पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २ लाख ६५ हजार ३५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विभागात ४ हजार ३६९ व्यक्ती होम क्वारंटाईन तर २२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली..