शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सटाण्यात कोरोनाचा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:09 IST

सटाणा : कुचकामी यंत्रणेमुळे सर्वच पातळीवर फज्जा उडत असल्याने सटाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नितीन बोरसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : कुचकामी यंत्रणेमुळे सर्वच पातळीवर फज्जा उडत असल्याने सटाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.बागलाण तालुक्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये सहा ठिकाणी कोरोना संशयितांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये अजमिर सौंदाणे येथील शासकीय एकलव्य रेसिडेन्सियल स्कूल, नामपूर, सटाण्यात चार ठिकाणचा समावेश आहे. मात्र बहुतांश ठिकाणी पाण्याची आणि स्वच्छतागृहांची मोठी समस्या दिसून येत आहे. सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात मालेगावसह बाहेरगावाहून येणारे लोंढे अपुऱ्या पोलीस बळामुळे रोखण्यात यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळेच सटाण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शहरात सोशल डिस्टन्सिंचादेखील फज्जा उडाला आहे. संपूर्ण शहरात गर्दीच गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे.---------------अपुरे शिवभोजन केंद्र..कामाअभावी परप्रांतीय अथवा स्थानिक मजुरांची उपासमारी होऊ नये म्हणून शासनाने पाच रु पयात शिवभोजन थाळीची व्यवस्था केली आहे. सध्या बागलाण तालुक्यातील सटाण्यात १५० थाळीचे दोन केंद्र सुरू केले आहे. मात्र ते शहरासाठी अपुरे पडत असून, शहरात आणखी तीन केंद्र तर नामपूर येथे दोन, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.------------मोफत धान्याचे वाटपकोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. याचा अटकाव करण्यासाठी शासनाने लॉकडाउनसारखे कठोर पाउल उचलल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. त्याचा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकावरही परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. या लॉकडाउनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्नपाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य दिले जात आहे.----------------------------परप्रांतीय मजुरांची प्रशासनाकडून सोयझारखंड, राजस्थान येथील दीडशेहून अधिक कामगार, मजूर अडकले आहेत. त्यांच्यासाठी तसेच स्थानिक मजुरांसाठी रोजगार हमीची कामे सुचविण्यात आली आहेत. नामपूर परिसरात साठ ते सत्तर जण थांबले असून, त्यांच्या अन्नधान्याची सोय प्रशासनाने केली; मात्र त्यांनी चांगल्या प्रतीचा गहू आणि तांदूळ नसल्याची तक्र ार करत शिधा नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या साठ ते सत्तर जणांनी एवढ्यावरच न थांबता आम्हाला चांगल्या प्रतीचा गहू, तांदूळ तर द्याच; परंतु किराणा साहित्य आणि भाजीपालादेखील भरून द्या, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने मात्र हात वर करत आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो; परंतु आपली मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे सांगितल्याने आमचे काम मजुरीचे नसल्याचे सांगत ते आजही आपल्या मागणीवर ठाम आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक