शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

जिल्ह्यात लोकसहभागातून ‘कोरोनामुक्त गाव अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:32 IST

कोरोनाचा  ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व  ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावपातळीवर उपाययोजना

सायखेडा : कोरोनाचा  ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व  ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.अभियानाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गटविकास अधिकारी यांच्यासह  जवळपास १४०० ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्याशी नुकताच संवाद साधला. त्यानुसार ग्रामीण भागात क्षेत्रीय पातळीवर कामाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्राची आखणी, प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांची देखरेख याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. लोकसहभाग वाढवून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अनेक गावात स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गावातच लक्ष देऊन नियोजन केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही गावांमध्ये १०० वर रुग्ण होते. ही संख्या १० च्या खाली आणण्यात यामुळे यश आले आहे. ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात खाटा पूर्ण क्षमतेने भरल्याने दबाव वाढता आहे. अनेक लोक गृह विलगीकरणात न थांबता बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना गावात संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. या माध्यमातून ग्रामीण आरोग्य केंद्राशी संबंधित कर्मचारी योग्य काळजी घेऊन घरोघरी न जाता एका जागेवर सेवा देणे शक्य होत  आहे.अनेकजण राहून घरामध्ये लक्षणे लपवून ठेवणे, वेळेवर उपचार न करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एकत्रितपणे नियोजन करून संबंधितांची योग्य उपचार, घरगुती आहार याबाबत नियोजन  केले जात आहे. त्यामुळे किमान १० दिवस रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात थांबून कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हॉटस्पॉट गावांवर विशेष लक्षnहॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये ४५ वयोगटावरील १०० टक्के नागरिकांच्या लसीकरणावर भर. nरुग्णांसाठी गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था. nरुग्ण आढळून आल्यास कंटेनमेंट झोन तयार करून काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या