शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
2
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
3
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
4
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
5
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
6
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
7
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
8
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
9
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
10
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
11
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
12
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
13
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
14
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
15
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
16
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
17
IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी...
18
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
19
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
20
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लोकसहभागातून ‘कोरोनामुक्त गाव अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:32 IST

कोरोनाचा  ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व  ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावपातळीवर उपाययोजना

सायखेडा : कोरोनाचा  ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व  ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या माध्यमातून गाव ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.अभियानाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गटविकास अधिकारी यांच्यासह  जवळपास १४०० ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्याशी नुकताच संवाद साधला. त्यानुसार ग्रामीण भागात क्षेत्रीय पातळीवर कामाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्राची आखणी, प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांची देखरेख याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. लोकसहभाग वाढवून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अनेक गावात स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गावातच लक्ष देऊन नियोजन केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही गावांमध्ये १०० वर रुग्ण होते. ही संख्या १० च्या खाली आणण्यात यामुळे यश आले आहे. ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात खाटा पूर्ण क्षमतेने भरल्याने दबाव वाढता आहे. अनेक लोक गृह विलगीकरणात न थांबता बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना गावात संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. या माध्यमातून ग्रामीण आरोग्य केंद्राशी संबंधित कर्मचारी योग्य काळजी घेऊन घरोघरी न जाता एका जागेवर सेवा देणे शक्य होत  आहे.अनेकजण राहून घरामध्ये लक्षणे लपवून ठेवणे, वेळेवर उपचार न करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एकत्रितपणे नियोजन करून संबंधितांची योग्य उपचार, घरगुती आहार याबाबत नियोजन  केले जात आहे. त्यामुळे किमान १० दिवस रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात थांबून कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हॉटस्पॉट गावांवर विशेष लक्षnहॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये ४५ वयोगटावरील १०० टक्के नागरिकांच्या लसीकरणावर भर. nरुग्णांसाठी गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था. nरुग्ण आढळून आल्यास कंटेनमेंट झोन तयार करून काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या