शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस उसनवारीचा व्यवहार झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 3:57 PM

पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खेड्यात सुरू असलेला उधार उसनवारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह लहानमोठे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी वर्ग आर्थिक विवंचनेत

गोरख घुसळेपाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खेड्यात सुरू असलेला उधार उसनवारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह लहानमोठे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.खरिपाच्या तोंडावर व्यापारी वर्गही आर्थिक अडचणीत सापडला असल्याने खते, बी-बियाणे औषधे उधारीच्या वायद्यावर देणे त्यांनी थांबवून घेतले आहे. शेतकरीवर्ग या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत.कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. आठवडे बाजार, लग्नसोहळे, मंगल कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली असून, अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू केलेले आहे. मात्र बाजारपेठेत ग्राहक फिरकत नसल्याने लहान-मोठ्या विक्रेत्यांवर संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी खेड्यापाड्यात भरणारे आठवडे बाजार बंद असल्याने याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

पाटोदा परिसरातून पालखेड कालवा जात असल्याने या भागात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेत आहेत. कानडी, आडगाव, पिंपरी शिरसगाव, लौकी, दहेगाव पाटोदा, सोमठाणदेश, विखरणी, ठाणगाव या भागात शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. उत्पादित झालेला माल जवळच्या आठवडे बाजारात अथवा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला जातो.

कडक लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकता न आल्याने मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. कोरोना महामारी तसेच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर वर्गाला बसला आहे. त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सध्या शेतात काम उपलब्ध नाही तसेच शेतकरी वर्गाचे भांडवल संपल्यामुळे कामासाठी मजूर लावणे अवघड बनले आहे. खरीप हंगामाला पीककर्जाच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरीवर्ग गावातील सहकारी सोसायटी कार्यालय तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत,

मात्र सहकारी सोसायट्या सोडल्यास राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास दिरंगाई करीत आहेत. कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक टंचाई भासत असल्याने नातेवाईक मित्रमंडळी तसेच खासगी सावकारही व्याजाने पैसे देण्यास हात आखडता घेत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासcorona virusकोरोना वायरस बातम्या