शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस उसनवारीचा व्यवहार झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 15:57 IST

पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खेड्यात सुरू असलेला उधार उसनवारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह लहानमोठे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी वर्ग आर्थिक विवंचनेत

गोरख घुसळेपाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खेड्यात सुरू असलेला उधार उसनवारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह लहानमोठे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.खरिपाच्या तोंडावर व्यापारी वर्गही आर्थिक अडचणीत सापडला असल्याने खते, बी-बियाणे औषधे उधारीच्या वायद्यावर देणे त्यांनी थांबवून घेतले आहे. शेतकरीवर्ग या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत.कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. आठवडे बाजार, लग्नसोहळे, मंगल कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली असून, अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू केलेले आहे. मात्र बाजारपेठेत ग्राहक फिरकत नसल्याने लहान-मोठ्या विक्रेत्यांवर संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी खेड्यापाड्यात भरणारे आठवडे बाजार बंद असल्याने याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

पाटोदा परिसरातून पालखेड कालवा जात असल्याने या भागात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेत आहेत. कानडी, आडगाव, पिंपरी शिरसगाव, लौकी, दहेगाव पाटोदा, सोमठाणदेश, विखरणी, ठाणगाव या भागात शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. उत्पादित झालेला माल जवळच्या आठवडे बाजारात अथवा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला जातो.

कडक लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकता न आल्याने मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. कोरोना महामारी तसेच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर वर्गाला बसला आहे. त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सध्या शेतात काम उपलब्ध नाही तसेच शेतकरी वर्गाचे भांडवल संपल्यामुळे कामासाठी मजूर लावणे अवघड बनले आहे. खरीप हंगामाला पीककर्जाच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरीवर्ग गावातील सहकारी सोसायटी कार्यालय तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत,

मात्र सहकारी सोसायट्या सोडल्यास राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास दिरंगाई करीत आहेत. कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक टंचाई भासत असल्याने नातेवाईक मित्रमंडळी तसेच खासगी सावकारही व्याजाने पैसे देण्यास हात आखडता घेत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासcorona virusकोरोना वायरस बातम्या