शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना हद्दपार व्हावा, व्यवसायास बहर यावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:07 IST

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद करण्यात आले आहेत. परिणामी छोटे-मोठे व्यावसायिक यामुळे आर्थिक संकटात सापडले असून, शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाला कधी हद्दपार होणार आणि पुन्हा ‘अच्छे दिन’ कधी येणार या विवंचनेत ग्रामीण भागातील जनता सापडली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढाल ठप्प : आठवडे बाजार बंद केल्याने विक्रेत्यांची आर्थिक परवड

चंद्रमणी पटाईत नाशिक : सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद करण्यात आले आहेत. परिणामी छोटे-मोठे व्यावसायिक यामुळे आर्थिक संकटात सापडले असून, शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाला कधी हद्दपार होणार आणि पुन्हा ‘अच्छे दिन’ कधी येणार या विवंचनेत ग्रामीण भागातील जनता सापडली आहे.अनेक ग्रामपंचायतींनी स्वयंस्फूर्तीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले आहे. मात्र, कोरोनाच्या धास्तीने आठवडे बाजारावर अवलंबून असल्या व्यावसायिकांसह किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे.आठवडे बाजाराच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढालही ठप्प झाल्याने ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडल्याची भावना निर्माण झाली आहे. फिरते कापड विक्रेते, भेळ-भत्ता व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, घाऊक किराणा विक्रेते, हातगाडीवरून घरगुती साहित्य विक्रेते यांच्यासह कंगवा-फणी विक्रेते, गहू, तांदूळ विक्रेते, मांस विक्रेते आदींचा उदरनिर्वाह आठवडे बाजारवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मजूरवर्ग व शेतकरी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ते आठवडाभर लागणारे रेशन व जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला बाजारातून नेत असतात. त्यातच ज्या गावात आठवडे बाजार भरतो त्या गावच्या आसपास असलेल्या इतर खेड्यापाड्यातील नागरिकही आठवडे बाजारातूनच खरेदी करतात. मात्र, कोरोनापासून बचावासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेल्या आठवडे बाजारामुळे अनेकांना आपल्या मूलभूत गरजाही भागविणे अवघड झाले आहे. आठवडे बाजारावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही ब्रेक लागल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.स्वच्छतेसह जनजागृतीवर भरकोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, कोरोनाबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, विविध उपाययोजनांबद्दल चर्चा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांसह ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडल्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसह लग्नसोहळेही पुढे ढकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाला न घाबरता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी नागरिकांचे मनोबल वाढविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकही आवाहनास प्रतिसाद देत स्वत:सह समाजाच्या स्वास्थ्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.माझे किरकोळ विक्रीचे किराणा दुकान असून, सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या धुमाकुळामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आठवडे बाजारात विक्री करून आमचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र, तोच बंद झाल्याने भवितव्याची चिंता सतावत आहे. कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल आणि आठवडे बाजार कधी पूर्ववत होतील याचीच प्रतीक्षा लागली आहे.- किशोर मोरे, किराणा व्यावसायिक, नांदगावमी होलसेल बाजारातून रेडिमेड कपडे आणून ते आठवडे बाजारात विक्री करत असतो. मात्र, कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम तर झालाच शिवाय आता आठवडे बाजारही बंद झाल्यामुळे जगायचं कसं, असा प्रश्न उभा ठाकला आहे. आधीच बेरोजगारी वाढली आहे. त्यात व्यवसाय सुरू केला. मात्र, अस्मानी-सुलेमानी संकटांचा सामना करता सावरतो ना सावरतो तोच कोरोना व्यायरसने आक्रमण केल्याने जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.- संतोष पवार, कापड विक्रेता, मालेगावसध्या उन्हाचे दिवस आहेत. हंगामी असलेला धंदा म्हणून मी गावागावात गोळा आणि कुल्फी विकत फिरतो. मात्र, सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने आठवडे बाजर बंद झाले आहेत. त्यामुळे हंगामी व्यवसायावर संक्रांत आली असून, चार महिन्यात वर्षभराच्या होणाऱ्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. मुलगी लग्नाला आली असून, तिचे लग्न वर्षभर पुढे ढकलावे लागेल, असे वाटते आहे. कोरोना कधी हद्दपार होईल याची चिंता लागली आहे.- सुनील वाघ, कुल्फी विक्रेता, येवला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य