शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
4
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
5
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
6
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
7
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
8
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
9
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
10
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
11
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
13
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
14
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
15
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
16
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
17
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
19
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

खंडोबाच्या जागरण कार्यक्रमात कोरोनाने घातला "गोंधळ"!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:54 IST

राजापूर : सध्या लग्नसराईचे दिवस असून, यातील खंडोबाचे जागरण हा अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरोनाने ह्यगोंधळह्ण घातल्यामुळे सर्वाधिक फटका वाघ्यामुरळी या कलाकारांना बसला आहे.

ठळक मुद्देउपासमारीची वेळ : वाघ्यामुरळी कलावंतांसमोर आर्थिक पेच

राजापूर : सध्या लग्नसराईचे दिवस असून, यातील खंडोबाचे जागरण हा अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरोनाने ह्यगोंधळह्ण घातल्यामुळे सर्वाधिक फटका वाघ्यामुरळी या कलाकारांना बसला आहे.दरवर्षी खंडोबा महाराज व देवीचा कुलाचार कुलधर्म करून लग्नसराई सुरू होते, परंतु या वर्षी आणखी शासनाच्या नियमानुसार, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लग्नातील जागरण गोंधळाचा कार्यक्रम आता येथून पुढे बंद ठेवावा लागणार आहे. दि.१५ मार्चपर्यंत कार्यक्रमांना परवानगी होती. त्यामुळे राजापूर येथे जागरण गोंधळ हा कार्यक्रम फिजिकल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवून पार पडला. यात औरंगाबाद येथील नामवंत वाघ्या मंडळी मीराताई चंद्रकांत कावळे यांनी कोरोना महामारीविषयी जागरण गोंधळातून जनजागृतीपर गीतातून केली.मागील वर्षी लॉकडाऊन व आता शासनाच्या नियमानुसार लग्न, धार्मिक कार्यक्रम यांना बंदी घातल्याने, वाघे मुरळी कलावंतांची आर्थिककोंडी झाली आहे. लोक आता आपले कुटुंब सुरक्षित राहावे, म्हणून जागरण गोंधळाऐवजी घरच्या घरीच चार-पाच माणसांमध्ये दिवट्या साजरा करीत आहेत. त्यामुळे हातावरचे कुटुंब असलेल्या या कलाकारांना पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे.ग्रामीण भागात रात्रभर खंडोबा व देवीचा गोंधळ घातला जातो. जागरण गोंधळ घालण्याची ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आज महाराष्ट्रभर लोककला जागरण गोंधळाच्या परंपरेलाही मोठे स्थान असन, ज्यांच्या घरात शुभकार्य असते, त्यांना प्रथम खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे जावे लागते. तेथून घरी आल्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यात महाराष्ट्रातील नामवंत वाघ्या मंडळी यांना कार्यक्रमासाठी सुपारी दिली जाते. गोंधळाच्या दिवशी खंडोबा व देवीचा कुलाचार कुलधर्म करून पुढील जागरणाला आरंभ होतो.शासनाच्या आदेशानुसार आता लग्न सराईत होणारे धार्मिक कार्यक्रम बंद झाले असल्याने, महाराष्ट्रातील बऱ्याच वाघ्या मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट आल्यामुळे आमच्या जागरण गोंधळ कलाकारांना कोणी आमंत्रित करीत नाही, त्यामुळे या विषाणूचा मोठा फटका आम्हा वाघ्या मंडळींना बसला आहे.- मीराताई कावळे, प्रदेश अध्यक्ष, वाघ्यामुरळी, औरंगाबाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक