शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

खंडोबाच्या जागरण कार्यक्रमात कोरोनाने घातला "गोंधळ"!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:54 IST

राजापूर : सध्या लग्नसराईचे दिवस असून, यातील खंडोबाचे जागरण हा अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरोनाने ह्यगोंधळह्ण घातल्यामुळे सर्वाधिक फटका वाघ्यामुरळी या कलाकारांना बसला आहे.

ठळक मुद्देउपासमारीची वेळ : वाघ्यामुरळी कलावंतांसमोर आर्थिक पेच

राजापूर : सध्या लग्नसराईचे दिवस असून, यातील खंडोबाचे जागरण हा अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरोनाने ह्यगोंधळह्ण घातल्यामुळे सर्वाधिक फटका वाघ्यामुरळी या कलाकारांना बसला आहे.दरवर्षी खंडोबा महाराज व देवीचा कुलाचार कुलधर्म करून लग्नसराई सुरू होते, परंतु या वर्षी आणखी शासनाच्या नियमानुसार, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लग्नातील जागरण गोंधळाचा कार्यक्रम आता येथून पुढे बंद ठेवावा लागणार आहे. दि.१५ मार्चपर्यंत कार्यक्रमांना परवानगी होती. त्यामुळे राजापूर येथे जागरण गोंधळ हा कार्यक्रम फिजिकल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवून पार पडला. यात औरंगाबाद येथील नामवंत वाघ्या मंडळी मीराताई चंद्रकांत कावळे यांनी कोरोना महामारीविषयी जागरण गोंधळातून जनजागृतीपर गीतातून केली.मागील वर्षी लॉकडाऊन व आता शासनाच्या नियमानुसार लग्न, धार्मिक कार्यक्रम यांना बंदी घातल्याने, वाघे मुरळी कलावंतांची आर्थिककोंडी झाली आहे. लोक आता आपले कुटुंब सुरक्षित राहावे, म्हणून जागरण गोंधळाऐवजी घरच्या घरीच चार-पाच माणसांमध्ये दिवट्या साजरा करीत आहेत. त्यामुळे हातावरचे कुटुंब असलेल्या या कलाकारांना पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे.ग्रामीण भागात रात्रभर खंडोबा व देवीचा गोंधळ घातला जातो. जागरण गोंधळ घालण्याची ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आज महाराष्ट्रभर लोककला जागरण गोंधळाच्या परंपरेलाही मोठे स्थान असन, ज्यांच्या घरात शुभकार्य असते, त्यांना प्रथम खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे जावे लागते. तेथून घरी आल्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यात महाराष्ट्रातील नामवंत वाघ्या मंडळी यांना कार्यक्रमासाठी सुपारी दिली जाते. गोंधळाच्या दिवशी खंडोबा व देवीचा कुलाचार कुलधर्म करून पुढील जागरणाला आरंभ होतो.शासनाच्या आदेशानुसार आता लग्न सराईत होणारे धार्मिक कार्यक्रम बंद झाले असल्याने, महाराष्ट्रातील बऱ्याच वाघ्या मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट आल्यामुळे आमच्या जागरण गोंधळ कलाकारांना कोणी आमंत्रित करीत नाही, त्यामुळे या विषाणूचा मोठा फटका आम्हा वाघ्या मंडळींना बसला आहे.- मीराताई कावळे, प्रदेश अध्यक्ष, वाघ्यामुरळी, औरंगाबाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक