शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

कोरोना रुग्ण प्रथमच ३ हजारावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग सात दिवस दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यानंतर आठव्या दिवशी तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडून तब्बल ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग सात दिवस दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यानंतर आठव्या दिवशी तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडून तब्बल ३३३८ बाधित संख्येपर्यंत मजल मारली आहे. बुधवारी (दि. २४) दिवसभरात तब्बल १५ बळीदेखील गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी तब्बल ३३३८ बाधित रुग्ण तर २२२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नाशिक मनपा क्षेत्रात १०, ग्रामीणला ३, मालेगाव मनपा क्षेत्रात १ तर जिल्हा बाह्य १ असा एकूण १५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२६२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने दोन ते अडीच हजारावर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इन्फो

गत बुधवारीच गाठला होता दोन हजारांचा आकडा

गत आठवड्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्याआधीच्या आठवड्यात बाधितांचा आकडा हजार ते दीड हजार होता. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात हा आकडा पाचशे ते सहाशेदरम्यान होता. अवघ्या दोन आठवड्यात कोरोनाने वाढीचा महाभयानक वेग गाठला आहे. गत बुधवारी २१४६ पर्यंत मजल गाठल्यानंतर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती. तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित, शनिवारी २३८३ बाधित, रविवारी २३६०, सोमवारी २७७९ तर मंगळवारी २६४४ रुग्ण बाधित आढळून आले होते. या वेगाने जिल्ह्याची वाटचाल अत्यंत भयप्रद दिशेने सुरु झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

इन्फाे

नाशिक मनपा क्षेत्रात १८४९

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बुधवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १८४९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. शहरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळणे महापालिका क्षेत्रासाठी भीतीदायक आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातही बुधवारपासून कोरोना प्रसाराचा वेग वाढत असल्याचे ११९१ ग्रामीण बाधित आकड्यातून दिसून येत आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हाच कोरोनाच्या संकटाने वेढल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल पुन्हा ५ हजारावर

जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात मागील दोन आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, नमुना तपासणीच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारी ही प्रलंबित अहवाल संख्या पुन्हा पाच हजारांचा टप्पा ओलांडून ५१०४ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे घडू नये ते संकट नाशिककरांनी ओढवून घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

इन्फो

सप्टेंबरनंतर मार्चमध्येच इतके बळी

कोरोना रुग्ण संख्या वाढीबरोबरच बळींची वाढती संख्या ही अधिक संकटात टाकणारी आहे. तब्बल १५ बळींचा आकडा यापूर्वी गत वर्षी सप्टेंबर महिन्यातच गेले होते. त्यामुळे हा टप्पा ओलांडणे हे जिल्ह्यासाठी भयसूचक घंटाच ठरली आहे.